vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

देशातील जनतेला महागाईपासून वाचवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी विनंती राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली

वाढत्या महागाईवर राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल…

 

नवी दिल्ली प्रतिनिधीदेशातील जनतेला महागाईपासून वाचवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी विनंती राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली आहे. राहुल गांधी म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू होण्यापूर्वीच किमतीत झालेल्या विक्रमी वाढीमुळे गरीब आणि मध्यमवर्ग पिचला गेला आहे.

काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने महागाईवरून मोदी सरकारवर हल्लाबोल करत असतात. महागाईबाबत त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला टोला (Central Govt) लगावला आहे. त्यांनी शनिवारी ट्विट करताना लिहिले की, ‘राजा करे महल की तैयारी, प्रजा बेचारी महंगाई की मारी’  याआधी शनिवारी राहुल (Rahul Gandhi) यांनी महागाई आणखी वाढेल, असा इशारा दिला. यासोबतच देशातील जनतेला महागाईपासून वाचवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी विनंती त्यांनी केली होती. तेव्हा राहुल गांधी म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू होण्यापूर्वीच किमतीत झालेल्या विक्रमी वाढीमुळे गरीब आणि मध्यमवर्ग पिचला गेला आहे

यापूर्वी पाच राज्यांमध्ये पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतरही राहुल यांनी अनेक मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी एफडी, पीपीएफ, ईपीएफ आणि महागाईशी संबंधित आकडे ट्विट केले आणि जनतेला दिलासा देण्याची जबाबदारी सरकारची नाही का, असा सवाल केला

 

संबंधित पोस्ट

वसुलीचे आदेश देशमुखांनी दिले नाहीत;वाझेचा चांदीवाल आयोगापुढे जबाब

vishwatmaklokswamivarta

फिजी रिपब्लिकने गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान केला…

vishwatmaklokswamivarta

अक्षरवैदर्भी’चा आधार, जनसाहित्य चळवळीचा अध्वर्यू निमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.सुभाष सावरकर यांना श्रद्धांजली

सनातन धर्म याला संपविण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलीन आणि DMK समर्थकांनी जाळला परमहंस आचार्य यांचा पुतळा

vishwatmaklokswamivarta

वसई-विरार महापालिका क्षेत्रात रिंग रोडसाठी नव्याने प्रस्ताव तयार करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र महापालिकेकडे लवकरात लवकर हस्तांतरित करा· महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करा

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई