vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू; 838 घरांचे नुकसान, 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

राज्यात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू; 838 घरांचे नुकसान, 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले..

 

महाराष्ट्र प्रतिनिधी काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rains) पडत आहे. मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

अशात महाराष्ट्रात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा 1 जून ते 7 जुलैपर्यंतचा आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे.

यापैकी गेल्या 24 तासांत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे महाराष्ट्रात 838 घरांचे नुकसान झाले असून 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

याशिवाय 125 जनावरेही पावसामुळे दगावली आहेत. पूरग्रस्तांसाठी राज्यात 35 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे किमान 130 गावे बाधित झाली असून 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही दिलासादायक बाब आहे की, आतापर्यंत या ठिकाणाहून जीवितहानी झालेली नाही. मात्र मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

 

संबंधित पोस्ट

विधानसभा इतर कामकाज :मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारसीचा ठराव संमत

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण, पुराव्यांवरुन वाद, शिंदे गटाची नार्वेकरांकडे मोठी मागणी

vishwatmaklokswamivarta

पुढील 24 तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा; कोकणात ‘रेड अलर्ट’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘बिमा सखी योजने’चा ऐतिहासिक शुभारंभ” – शिवराज सिंह चौहान

खो-खो विश्वचषक-२०२५’ या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी दहा कोटी निधी मंजूर क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्णयामुळे ‘खो-खो’ ला पाठबळ

vishwatmaklokswamivarta

ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

vishwatmaklokswamivarta