
ग्रामपंचायत निवडणूक निकाल; 15 जिल्ह्यांपैकी 62 तालुक्यांतील 238 गावांमध्ये अनेकांना विश्वास ‘ विजय आपलाच’…
मुंबई प्रतिनिधीराज्यातील सत्तांतराच्या राड्यात ग्रामपंचायत निवडणूक 2022 चा धुरळा काहीसा झाकोळला गेला. असे असले तरी आता न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा राडा काहीसा शांत झाल्याने पुन्हा एकदा या धुरळ्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यभरात झालेल्या जवळपास 238 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (5 ऑगस्ट) पार पडत आहे.
राज्यातील सत्तांतराच्या राड्यात ग्रामपंचायत निवडणूक 2022 (Gram Panchayat Election Result) चा धुरळा काहीसा झाकोळला गेला. असे असले तरी आता न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा राडा काहीसा शांत झाल्याने पुन्हा एकदा या धुरळ्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यभरात झालेल्या जवळपास 238 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (5 ऑगस्ट) पार पडत आहे. आज पार पडणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022 साठी मोठी उत्सुकता आहे. अर्थात, राज्यभरात जून महिन्यामध्येच एकूण 271 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, त्यापैकी जवळपास 33 ग्रामपंचायती पूर्णत: किंवा अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरीत 238 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. खास करुन राज्यात झालेले सत्तांतर, ओबीसी आरक्षणाचा पेच आणि इतर सर्वच घडामोडींमुळे ग्रामीण जनतेच्या मनात काय याबाबत उत्सुकता वाढली आहे.
महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांपैकी 62 तालुक्यांमध्ये असलेल्या 238 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. या निवडणुकांसाठी काल म्हणजेच 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान पार पडले. त्यानंतर आज (5 ऑगस्ट 2022) लगेच मतमोजणी पार पडत आहे. त्यामुळे उत्सुकता ताणायला फार कारण राहणार नाही. राज्यात ग्रामपंचायतींसाठी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत साधरण 78% मतदान पार पडले आहे



