vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र राज्यातील जालना येथे  आयकर अधिकाऱ्यांची धाड 390 कोटींची माया जप्त; कारवाईसाठी ‘दुल्हल हम ले जायेंगे’चा कोड

महाराष्ट्र राज्यातील जालना येथे  आयकर अधिकाऱ्यांची धाड 390 कोटींची माया जप्त; कारवाईसाठी ‘दुल्हल हम ले जायेंगे’चा कोड

 

जालना प्रतिनिधी

आयकर विभागाने जालन्यामध्ये छापेमारी करत मोठी रक्कम जप्त केली असून, एका स्टील कारखाना आणि त्याच्या मालकाच्या घरावर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 390 कोटींची माया जप्त करण्यात आली आहे. यामध्ये 58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा 16 कोटींचा ऐवज तसेच सुमारे 300 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह महत्त्वाचा दस्तऐवज जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम अधिकाऱ्यांना मोजण्यासाठी तब्बल 13 लागल्याचे समोर आले आहे. छापेमारीसाठी जाताना आयकर विभागाच्या गाड्यांवर दुल्हन हम ले जायेंगे असा आशय असल्याचे स्टीकर लावण्यात आले होते.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी साधारण 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान चौकशी केली होती. त्यानंतर मोठी कारवाई करण्यात येणार असल्याची कुणकुण होती. या कारवाईमध्ये औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे. 1 ते 8 ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील 260 अधिकाऱ्यांसह कर्मचारी 120 हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात पोहोचले होते. ‘दुल्हन हम ले जायेंगे’चे वाहनांवर लावले स्टिकरजालना आणि औरंगाबाद येथे आयकर विभागाने केलेल्या कारवाईदरम्यान छापे टाकण्यात येणाऱ्या व्यक्तींना याची कल्पना येऊ नये यासाठी नाशिक, पुणे, ठाणे व मुंबईच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनांवर दुल्हन हम ले जायेंगे असे स्टीकर लावले होते. जेणे करून हे सर्व लग्नाला जात असल्याचे भासवण्यात आले. यातील काही गाड्यांवर वर आणि वधूच्या नावांचे स्टीकर लावण्यात आले होते.

 

कुठे सापडली रक्कमआयकर विभागातर्फे करण्यात आलेल्या या कारवाईत अधिकाऱ्यांना कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडून आली आहे. सुरुवातील अधिकाऱ्यांना काही आढळून आले नाही. मात्र, त्यानंतर अधिकाऱ्यांना कारवाईचा मोर्चा शहराबाहेरील आठ ते दहा किलोमीटरवरील फार्महाऊसकडे मोर्चा वळवला. त्यावेळी तेथे कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडली. जालन्यातील या कारवाईमध्ये स्टील तीन व्यवसायिकांकडेरोख रकमेसह सोन्याचे दागिने, बिस्किटे, नाणी, हिरे आढळून आले असून, सोन्याच्या 32 किलो दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत 16 कोटी रुपये आहे. याशिवाय अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांच्या घरं, कार्यालयांसह विविध ठिकाणांहून महत्त्वाची कागदपत्र जप्त केली आहे.

 

संबंधित पोस्ट

भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून डी. वाय. चंद्रचूड शपथबद्ध…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन

बंदरांची कामे दर्जेदार व कालमर्यादेत पूर्ण करावीत – मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे पुढील १०० दिवसांमध्ये बंदरे विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने करावयाच्या कामांचा घेतला आढावा

प्रमुख प्रचारकांची संख्या आता २० ऐवजी ४०

vishwatmaklokswamivarta

बकरी ईद निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची घोषणाबाजी, आदित्य ठाकरे यांची खोचक प्रतिक्रिया