vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ओबिसी आंदोलन आता २० जानेवारी ऐवजी २६ जानेवारीस ;कोकणातील कुणबीही आंदोलनात सामील होणार

ओबिसी आंदोलन आता २० जानेवारी ऐवजी २६ जानेवारीस ;कोकणातील कुणबीही आंदोलनात सामील होणार

 

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील ओबीसी समाजाचे आंदोलन २० जानेवारी रोजी आझाद मैदानात होणार होते , ते आता २६ जानेवारी रोजी करणार आहोत. अशी माहिती ओबीसी जनमोर्चा चे नेते प्रकाश शेंडगे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली.

 

मराठा समाजाने कुणबी समाजाचे आरक्षण घेऊ नये. जर मराठा समाजाने कुणबी समाजाचे आरक्षण घेतले तर मराठा समाजाचे नुकसानच आहे. मराठा समाजाला सध्या आर्थिक मागास प्रवर्ग मधून ज्या सवलती सुरू आहेत , त्या सवलती मराठा समाज जर कुणबी समाजात गेला तर रद्द होतील. त्यामुळे मराठा समाजाने वेगळा विचार करत आरक्षण मागावे . असे आवाहन शेंडगे यांनी केले.

 

जो प्रस्तापित मराठा समाज आहे , त्यांना राजकीय फायदा मिळावा म्हणून गरीब मराठ्यांना वेगळ्या मार्गावर भरकवटले गेले आहे. मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत ते गरीब मराठा समाजासाठी आहे. हे आम्हालाही मान्य आहे. गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका आमचीही आहे.पण त्यासाठी कुणबीच्या ताटातले न घेता वेगळ्या मार्गाचा विचार सरकारने करावा.असे यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित आलेले राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्कार विजेते उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांनी सांगितले.

 

कुणबी समाजात जर मराठा समाज सामील झाला तर दोन्ही समाज अजून गरीब होईल.एका बसमधे ६० आसन व्यवस्था असताना त्यात ९० प्रवासी आहेत. त्यात अजून १५० प्रवासी घ्या म्हणून मागणी केली तर त्या बस चे कसे होईल. असे उदाहरण लक्ष्मण गायकवाड यांनी यावेळी दिले.

 

मराठे हे मोगलांचे गुलाम होते. त्या मराठ्यांचे गुलाम अठरा पगड जातीतील आम्ही ओबीसी होतो. आता जर यांचे एकत्रीकरण झाले तर आरक्षणाचा गोंधळ तर होणारच आहेच , मात्र श्रीमंत व गरीब मराठे हा वाद निर्माण होऊन ओबीसी आरक्षनाचा लाभ कोणालाच भेटणार नाही असे लक्ष्मण गायकवाड यावेळी म्हणाले.

 

.

संबंधित पोस्ट

देशभरातील विविध राज्यांमध्ये येत्या दोन दिवसांत दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

vishwatmaklokswamivarta

नाबार्डचा १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पतआराखडा-जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन

vishwatmaklokswamivarta

आरटीई’ टप्पा क्र. ४ प्रवेशासाठी मुदतवाढप्रवेश प्रक्रिया आता ९ जून २०२५ पर्यंत..

जनसंपर्क कक्ष – मुख्यमंत्री सचिवालय-मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन…

vishwatmaklokswamivarta

राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा , मुख्यमंत्र्यांकडे पोचले पीए

अहमदाबादच्या विमान दुर्घटनेतील मृत प्रवाशांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली अकोला दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कार्यक्रम साध्या पद्धतीने घेत मृत प्रवाशांना श्रद्धांजली