vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नाबार्डचा १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पतआराखडा-जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन

नाबार्डचा १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पतआराखडा-जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-जिल्ह्याचा सन २०२५-२६ साठी १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पतआराखडा नाबार्ड मार्फत तयार करण्यात आला असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या आराखड्याचे विमोचन केले. जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक मंगेश केदार आणि नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुरेश पटवेकर हे यावेळी उपस्थित होते.

या संदर्भत नाबार्डचे व्यवस्थापक सुरेश पटवेकर यांनी माहिती दिली की, कृषी पत, कृषी पायाभूत सुविधा आणि पूरक क्षेत्रविकास अशा तीन क्षेत्रांचे वर्गीकरण करुन पतआराखड्यात तरतूद करण्यात आली आहे. त्यात कृषी पत यात ४ हजार २६७ कोटी रुपये, त्यात प्राधान्याने शेतमाल उत्पादन, देखभाल व विपणन, कृषी कर्ज व संलग्न उपक्रमांचा समावेश आहे. कृषी पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी २३९ कोटी रुपयांची तरतूद असून इतर पूरक क्षेत्रविकास क्षेत्रासाठी सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांस्ठी ८०१० कोटी रुपये, निर्यात कर्ज पुरवठ्यासाठी ३६ कोटी रुपये, शिक्षणासाठी ९९ कोटी रुपये, सामाजिक पायाभूत सुविधा ७८ कोटी रुपये, उर्जा नविनीकरणासाठी ६० कोटी रुपये, इतर ४३३ कोटी रुपये असा एकूण १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पत आराखडा तयार करण्यात आला आहे. गत वर्षी पत आराखडा १२ हजार ७६५ कोटी रुपयांचा होता, अशी माहिती सुरेश पटवेकर यांनी दिली.

संबंधित पोस्ट

केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा- खा. श्रीरंग बारणे दिशा’ समितीची बैठक संपन्न

पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी करा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये ज्ञानक्षम व्हावे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री  यांनी सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांचे केले स्वागत..

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके 30 जानेवारीपर्यंत पाठविता येणार

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासह ‘एसआयआर’च्या कामाला गती द्यावी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या सूचना

पुढील ३ तासात मुंबई मुंबई उपनगर पालघर, पुणे, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांत काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह ताशी ५०-६० किमी वेग जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क रहावे. – मंत्रालय