vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा , मुख्यमंत्र्यांकडे पोचले पीए

राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा , मुख्यमंत्र्यांकडे पोचले पीए

 

राज्य प्रतिनिधी: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्यानं टीका होत असताना अखेर आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली.माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठविला आहे.

वाल्मिक कराड याचं संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुख्य आरोपी म्हणून नाव आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दाखल केलेल्या सीआयडीच्या आरोपपत्रात कराडला क्रमांक एकचे आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं. या प्रकरणांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी रात्री फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना आज मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं होतं, अशी माहिती सूत्रानं दिली.

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री मुंडे हे बीड जिल्ह्यातील परळी येथील राष्ट्रवादीचे आमदार आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांना पालकमंत्री पद देण्यात आलेलं नव्हतं. सध्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे पुण्यासह बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.

९ डिसेंबरला झाली होती हत्या-मस्साजोग गावचे सरपंच देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी खंडणीसाठी हत्या करण्यात आली होती. राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं (सीआयडी) २७ फेब्रुवारी रोजी देशमुख यांच्या हत्येसह संबंधित दोन प्रकरणांमध्ये बीड जिल्ह्यातील न्यायालयात १,२०० पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सात जणांना अटक करून मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामधील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.

संबंधित पोस्ट

जालना जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न ऑलिम्पिक स्पर्धेतील दर्जाचा स्विमींग पुल तयार करण्यात यावा  – पालकमंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी..

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राज्यातील लखपती दीदी आणि बचतगटांच्या महिलांची विशेष उपस्थिती महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आर. विमला यांच्याकडून महिलांचे कौतुक;अंजना कुंभार यांना राष्ट्रपती भवनात विशेष निमंत्रण…

युद्धजन्य परिस्थितीत युवकांनी केला विजयाचा संकल्प: हनुमान जयंतीला सामूहिक गदापूजन !रामराज्य स्थापनेसाठी देशभरात ८५० हून अधिक ठिकाणी, तर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात ४५ हून अधिक ठिकाणी, सामूहिक ‘गदापूजन’ संपन्न!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमता दूर करून समाजात समता, बंधुता आणि सर्वांना समान संधी देणारे संविधान देशाला दिले. ज्ञानाच्या बळावर त्यांनी समाजात समतेची जाणीव दृढ केली-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

vishwatmaklokswamivarta

नाशिक येथील गृहनिर्माण कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta