vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा , मुख्यमंत्र्यांकडे पोचले पीए

राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा , मुख्यमंत्र्यांकडे पोचले पीए

 

राज्य प्रतिनिधी: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्यानं टीका होत असताना अखेर आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली.माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठविला आहे.

वाल्मिक कराड याचं संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुख्य आरोपी म्हणून नाव आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दाखल केलेल्या सीआयडीच्या आरोपपत्रात कराडला क्रमांक एकचे आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं. या प्रकरणांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी रात्री फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना आज मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं होतं, अशी माहिती सूत्रानं दिली.

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री मुंडे हे बीड जिल्ह्यातील परळी येथील राष्ट्रवादीचे आमदार आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांना पालकमंत्री पद देण्यात आलेलं नव्हतं. सध्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे पुण्यासह बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.

९ डिसेंबरला झाली होती हत्या-मस्साजोग गावचे सरपंच देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी खंडणीसाठी हत्या करण्यात आली होती. राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं (सीआयडी) २७ फेब्रुवारी रोजी देशमुख यांच्या हत्येसह संबंधित दोन प्रकरणांमध्ये बीड जिल्ह्यातील न्यायालयात १,२०० पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सात जणांना अटक करून मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामधील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.

संबंधित पोस्ट

कारागृहातील कैद्यांनी चांगले व्यक्तिमत्त्व बनून जीवन जगावे  – कारागृह अधीक्षक विजय कांबळे,सांगली जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी “जीवनगाणे गातच जावे”

महावितरणच्या जरीदा उपकेंद्रामुळे ५० गावाचा विजेचा प्रश्न सुटला*सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश भुषण गवई यांचे विशेष प्रयत्न..

१२ वी निकाल २०२५: ठाणे जिल्ह्याचा घवघविता यश – कोकण विभागात दुसरा क्रमांक! मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा..

भारतीय निवडणूक आयोगाच्या मते, बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६७.१४% मतदान झाले.

vishwatmaklokswamivarta

आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र सदनात २३ जुलै रोजी ‘माझे माहेर पंढरी’ कार्यक्रम गायिका शमिमा अख्तर यांचे अभंग गायन; वारीवरील विशेष माहितीपटाचेही प्रदर्शन

पुण्यातील नॅन्सी होम प्रकल्पास विभागीय आयुक्तांनी भेट देऊन तातडीने अहवाल सादर करावा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

vishwatmaklokswamivarta