vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

१२ वी निकाल २०२५: ठाणे जिल्ह्याचा घवघविता यश – कोकण विभागात दुसरा क्रमांक! मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा..

१२ वी निकाल २०२५: ठाणे जिल्ह्याचा घवघविता यश – कोकण विभागात दुसरा क्रमांक! मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा..

 

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, ठाणे जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन करत कोकण विभागात दुसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९३.७४% इतका लागला असून, एकूण ९६,०८९ विद्यार्थ्यांपैकी ८९,८२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यात मुलींचा निकाल ९२.९१% तर मुले ८९.५५% उत्तीर्ण झाले असून, मुलींची सरासरी कामगिरी मुलांपेक्षा जास्त आहे. तसेच जिल्ह्यात ८७५० विदयार्थी यांनी फेरपरीक्षा दिली असून त्या पैकी ५४२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत     जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले, “हा निकाल विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य यांचा संगम आहे. परीक्षेत पारदर्शकता राखण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांचे हे यश आहे.”

कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा – ठाणे जिल्ह्याची यशोगाथा,शिक्षण विभागाने यंदा परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्रांवर शिस्त व पारदर्शकता राखण्यासाठी खालील उपाययोजना केल्या होत्या:

१. ड्रोन कॅमेराद्वारे संवेदनशील परीक्षा केंद्रांवर देखरेख.

२. परीक्षा केंद्रांवर सर्व भौतिक सुविधा पूर्वतयारीतच उपलब्ध.

३. परीक्षा केंद्रांच्या बाहेरील परिसरात व्हिडीओ चित्रीकरण.

४. भरारी पथके व बैठी पथकांची नियुक्ती – ३२ केंद्रांवर भरारी पथके कार्यरत.

५. Maharashtra Prevention of Malpractices Act 1982 अंतर्गत नियमावलीची कडक अंमलबजावणी.

६. परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ठेवणे व कलम १४४ लागू करणे.

      या अनुषंगाने माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी सांगितले, “या वर्षीच्या परीक्षेमध्ये शिस्त, पारदर्शकता आणि गुणवत्ता यांचा आदर्श ठाणे जिल्ह्याने घालून दिला आहे. कोणतीही अप्रिय घटना न घडता परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली, हे सर्व टीमवर्कचे फलित आहे.”

निकालाचे ठळक मुद्दे:

• एकूण विद्यार्थी:९६०८९

• उत्तीर्ण विद्यार्थी: ८९८२७

• एकूण निकाल: ९३.७४%

• मुली: ४६,९६५ उत्तीर्ण / ५०,७१५ एकूण विद्यार्थी → ९२.९१%

• मुले: ४८,२८३ उत्तीर्ण / ५४,१२४ एकूण विद्यार्थी → ८९.५५%

000000

संबंधित पोस्ट

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण..

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अपघातातील मृत्युमुखींच्या कुटुंबियांचे सांत्वन 

शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे देणार; ५०० कोटी उत्पन्न मिळविण्याचे महामंडळाला उद्दिष्ट – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

कृपया प्रसिद्धीसाठी-कोवळ्या बालकांसाठी ‘गोमांस’ खाण्याचा अजब सल्ला! वाशी रुग्णालयातील आक्षेपार्ह पत्रक नष्ट करून सर्व दोषींवर गुन्हे दाखल करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

-: दुःखद बातमी :- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे काळाच्या पडद्याआड*

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी ‘मेकिंग द डिफरन्स’ एनजीओ व पीपीएफएएस म्युच्युअल फंडचा संयुक्त पुढाकार‘संजीवनी’ प्रकल्पांतर्गत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण; प्रत्येकी ७० पेक्षा अधिक वैद्यकीय उपकरणांची मदत