vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बदलापूर येथील आदर्श स्कूल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे  याच्या घराची गावकऱ्यांनी केली तोडफोड

बदलापूर येथील आदर्श स्कूल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे  याच्या घराची गावकऱ्यांनी केली तोडफोड

 

ठाणे प्रतिनिधी

बदलापूर येथील आदर्श स्कूल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे  याच्या घराची गावकऱ्यांनी तोडफोड करून त्याच्या कुटुंबालाही गावातून हुसकून लावले आहे. आल्याची माहिती समोर येत आहे

शाळेतील अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक गैरवर्तन आणि अत्याचार (केल्याचा अक्षयवर आरोप आहे. पलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्यास 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी कारवाई केली असली तरी, स्थानिक पालक आणि गावकरी यांच्या मनात अजूनही संताप कायम आहे. या संतापातूनच गावकऱ्यांनी अक्षयच्या कुटुंबीयांना घरातून बाहेर काढले आणि खरवई गावातूनही हुसकून लावले.

बदलापुरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर साडेतीन वर्षे वयाच्या दोन मुलींसोबत झालेल्या लैंगिक अत्याचार आणि गैरवर्तनामुळे गावकरी मोठ्या संख्येने आणि पालक इतके संतप्त झाले की, त्यांनी शाळेची तोडफोड केली. तसेच, बदलापूर स्टेशनवर रेलरोको केला. संपूर्ण बदलापूर यामध्ये सहभागी झाला होता आणि बंदचे आव्हान केले होते परंतु पोलिसांनी कारवाई केली असली तरी, अद्यापही पालक संतप्तच आहेत. गावकऱ्यांच्या मनात राग धुमसतो आहे. या रागातूनच गावकऱ्यांनी आरोप अक्षय शिंदे याचे घर गाठले आणि त्यांनी कुटुंबीयांना बाहेर काढले. त्यानंतर त्याच्या घराची तोडफोड केली, असा दावा अक्षयच्या कुटुंबीयांनी केला आहे

संबंधित पोस्ट

आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा – राज्यपाल सी पी राधाकृष्णन एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत राजभवन येथे सिक्कीम राज्य स्थापना दिवस

शिवसेना आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद..

प्रियांका गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण शहरात काँग्रेस प्रणित रिक्षा युनियन स्थापना

vishwatmaklokswamivarta

भक्ती, परंपरा आणि आनंदाने भारलेली दिंडी – पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग

आम्ही मत देऊ शकत नाही पण तुम्ही द्या!,शालेय विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती

खरीप हंगाम २०२५-२६ साठी ३ लाख मे.टन खतांचे आवंटन मंजूर,दर्जेदार कृषी निविष्ठांच्या उपलब्धतेचे नियोजन करा- जिल्हाधिकारी स्वामी