vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

श्रीष्टी तांडा येथील रोहयो कामांमध्ये गैरव्यवहार : चौकशी करण्याची जि. प. प्रशासनाकडे मागणी

श्रीष्टी तांडा येथील रोहयो कामांमध्ये गैरव्यवहार : चौकशी करण्याची जि. प. प्रशासनाकडे मागणी

 

—————————————

जालना (प्रतिनीधी) परतूर तालुक्यातील मौजे श्रीष्टी तांडा येथे रो.ह.यो.अंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार होत असून या कामांची सखोल चौकशी करावी अशी मागणी बादल राठोड यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, श्रीष्टी येथे रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिर, पांदन रस्ते, शेततळे, इत्यादी कामे मंजूर करण्यात आली असून सदर कामे मजुरांच्या माध्यमातून करणे गरजेचे असतांना जेसीबीच्या सहाय्याने केली जात आहे.त्यामुळे गावातील मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने मजुरांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.यंत्रांच्या सहाय्याने काम करून बोगस मजूर दाखवली जात असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. या सर्व कामांची चौकशी करून सदर कामे स्थगीत करावी व संबंधितावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी बादल राठोड यांनी केली आहे. याप्रकरणी चौकशी न झाल्यास आपल्या कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील बादल राठोड यांनी या निवेदनात दिला आहे

संबंधित पोस्ट

आजपासून आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरवात*एसएमएस आलेल्या पालकांनी कागदपत्रे पडताळणी करण्याचे आवाहन..

मुंबईतील सायन कोळीवाडा प्रतीक्षा नगर परिसरात स्वच्छता हीच सेवा या अभियानाचा पहिला टप्पा पार..

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना पीसीएमच्यावतीने वृत्तपत्र व पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta

मोबाईल व्हॅन, रुग्णवाहिकांचे 9 फेब्रुवारी रोजीउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण..आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी ठाणे येथे कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जनआरोग्य योजनांचा आढावा शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार आरोग्य सेसेवेसाठी साऱ्यांचे सहकार्य आवश्यक-डॉ.ओमप्रकाश शेट्ये.

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावाआपत्ती काळात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य -पालकमंत्री शंभूराज देसाई