vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

धान-भरडधान्य खरेदीच्या शासकीय पोर्टलवरील नोंदणीस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती…

धान-भरडधान्य खरेदीच्या शासकीय पोर्टलवरील नोंदणीस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती…

 

राज्य प्रतिनिधी-

शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता 31 डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान/ भरडधान्य खरेदी केले जाते. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.

खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये शेतकरी नोंदणीकरिता 31 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत होती. मात्र अनेक भागातील शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने शासनाने नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अर्थ व नियोजन विभागाचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार राजू कारेमोरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी केली होती. या मागणीस अनुसरून शेतकरी नोंदणीची मुदत 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग यांनी महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळासह संबंधित एजन्सी यांना याबाबत कळवले आहे.

 

ही मुदतवाढ अंतिम असून विहित मुदतीत शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी , एमएसआरटीसी बसला मध्य प्रदेशमध्ये अपघात, पुलाचा कठडा तोडून बस नर्मदा नदीत कोसळली; 13 जणांचा मृत्यू, 15 जण बेपत्ता…

Sambhajiraje Chhatrapati: छत्रपती संभाजीराजे तीन मे नंतर काय भूमिका घेणार? ‘त्या’ वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

अमरावती जिल्ह्यासाठी ‘आधारभूत’ खरेदी केंद्रांना मंजुरी;शेतकऱ्यांना तातडीने नोंदणीचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेचा 26 वा दीक्षान्त समारंभ…भारत देशाची 2047 पर्यंत विकसित भारत ओळख निर्माण होईल.– राज्यपाल

मतदान केंद्रावर पाळणा घर, प्रथमोपचार पेटी आणि व्हिल चेअर सुद्धा; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा..