vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात हुंडा विरोधी सप्ताहाचे आयोजन

जिल्ह्यात हुंडा विरोधी सप्ताहाचे आयोजन

 जालना, प्रतिनिधी : महिला व बाल विकास मंत्रालय मुंबई शासन राजपत्र दि. 25 जुलै, 2016 अन्वये हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961च्या कलम 8 (ब)(1) आणि महाराष्ट्र राज्य हुंडा प्रतिबंधक नियम 2003 च्या नियम 4 नुसार राज्यस्तरावर आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अणि तालुकास्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकारी हे हुंडा प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. तरी प्रत्येक हुंडा प्रतिबंधक अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व सुजान नागरिकांनी 26 नोव्हेंबर हा दिवस हुंडाबंदी दिन म्हणून तर त्यापुढील 7 दिवस हुंडा बंदी सप्ताह म्हणून साजरा करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे

सध्यस्थितीमध्ये असे प्राकर्षाने निदर्शनास येत आहे की, समाजामध्ये हुंडा प्रथा अजूनही कायम असून या कुप्रथेच्या निर्दोष महिला बळी पडत आहेत. विवाहाच्या वेळी मागितलेला आर्थिक लाभ, रोख रक्कम अथवा विवाहच्यावेळी अथवा विवाहानंतर केंव्हाही जी रक्कम किंवा मालमत्ता, वस्तु, दागदागीने ईत्यादी मागण्यात येते त्याला हुंडा समजले जाते. सदर कायदा असूनही त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. या कुप्रथेला आळा बसणे नितांत आवश्यक आहे तरच समाजामध्ये महिला निर्भीडपणे जगू शकतील. या करीता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांचे कार्यकक्षेत अतिशय जागृतपणे सदर कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करणे करीता प्रचार प्रसिध्दी करणे आवश्यक आहे. हुंडा देणे, घेणे किंवा घेण्यास प्रोत्साहन तसेच गुन्हा घडल्यास नमुद अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. समाजातुन या कुप्रथेचे समुळ उच्चाटन करणे आवश्यक आहे. असेही कळविले आहे

संबंधित पोस्ट

मोठी बातमी: पश्चिम बंगालमध्ये नव्या पर्वाची सुरुवात! शुभेंदु अधिकारी यांची भाजप विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड; राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून होणार नियुक्ती 

जालना जिल्हा घरगणना मोहिमेत राज्यात अव्वल हाऊस लिस्टिंग ऑपरेशनमध्ये 94.59 टक्के प्रगती

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत फेलोंना मिळणार‘आयआयटी’ बॉम्बेचे मार्गदर्शन सार्वजनिक धोरण प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी राज्य शासन व ‘आयआयटी’ बॉम्बेमध्ये सामंजस्य करार

ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून ऑलिंपिक दिनाचे आयोजन

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत अथलेटिक्स निवडचाचणी १४ मे रोजी

टीबी मुक्त भारत अभियान’ मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याच्यादृष्टीने दृष्टीने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित या अभियानाचा शुभारंभ राज्‍यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न