vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

इस्लामपूर येथे आज विधी साक्षरता, शासकीय योजनांचा महामेळावा…

इस्लामपूर येथे आज विधी साक्षरता, शासकीय योजनांचा महामेळावा…

 

            सांगली, प्रतिनिधी

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने  इस्लामपूर येथे विधी साक्षरता व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे संयुक्त आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष प्रदीप शर्मा यांनी केले आहे.  श्री सर्जेराव यादव मल्टीपर्पज हॉल, इस्लामपूर येथे होणार आहे.  या महामेळाव्याचे उद्‌घाटन उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तथा जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती श्रीमती भारती डांगरे व अभय आहुजा यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष प्रदीप शर्मा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 या महामेळाव्यात विविध शासकीय कार्यालयांचे एकूण 30 स्टॉल मांडण्यात येणार आहेत. शासकीय कार्यालयाचे अधिकारी/प्रतिनिधी प्रत्येक स्टॉलवर त्यांच्या विभागांतर्गत योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच या महामेळाव्यात विविध शासकीय योजनांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. तसेच, प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थींना योजनांचा लाभ मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. तरी महामेळाव्याचा विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

शिक्षणाच्या खासगीकरणावर भर : आमदार सुधाकर अडबाले यांची टीका

vishwatmaklokswamivarta

सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात ‘पद्मश्री’प्रमाणे ४ जणांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ व २० जणांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार *हिंदु राष्ट्ररत्न-आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड, डॉ. सच्चिदानंद शेवडे;- सनातन धर्मश्री : आमदार टी. राजा सिंह, अधिवक्ता विष्णु जैन, प्रमोद मुतालिक..

कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षणातून मुलींना आत्मविश्वासाचे कवच  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील-

आंबेनळी घाट अपघात: मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करा;पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सातारा व रायगड जिल्हा प्रशासनाला निर्देश

भारतातील नागरी विमान वाहतूक क्षेत्राने नवा टप्पा गाठला आहे. वाराणसी येथून देशातील पहिल्या हब-अँड-स्पोक आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेची सुरुवात करण्यात आली आहे.

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे,दुर्घटनाग्रस्त विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी समोर आलेली आहे.

vishwatmaklokswamivarta