vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

स्वामी विवेकानंद जयंती : राष्ट्रीय युवक दिवस-राज्यपालांच्या उपस्थितीत रामकृष्ण मिशनच्या ‘विवेक कार्यशाळेचे उद्घाटन’यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, युवकांनी स्वयंशिस्त पाळावी- राज्यपाल सी पी राधाकृष्णन

स्वामी विवेकानंद जयंती : राष्ट्रीय युवक दिवस-राज्यपालांच्या उपस्थितीत रामकृष्ण मिशनच्या ‘विवेक कार्यशाळेचे उद्घाटन’यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, युवकांनी स्वयंशिस्त पाळावी- राज्यपाल सी पी राधाकृष्णन

 

मुंबई, प्रतिनिधी : जन्मापासून आपण समाजाकडून सर्व काही घेत असतो. त्यामुळे समाजाच्या ऋणाची उतराई होणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे सांगून यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी तसेच युवकांनी स्वयंशिस्त पाळावी तसेच समाजाप्रती उत्तर दायित्वाची भावना ठेवावी असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थी व युवकांना संबोधित करताना केले.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून मुंबईतील रामकृष्ण मठ आणि मिशनतर्फे आयोजित विवेक कार्यशाळेचा शुभारंभ राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. १३) रामकृष्ण मिशन सभागृह, खार येथे संपन्न झाला.

स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली रामकृष्ण मिशन ही संस्था शिस्त, भक्ती, उत्तरदायित्व व सर्वधर्मसमभावासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या सर्व उपक्रमात रामकृष्ण मिशन सर्व धर्म, जाती व पंथाच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेते हे सर्वधर्मसमभावाचे उत्तम उदाहरण असल्याचे राज्यपालांनी सांगितले. समाजाकडून घेतलेल्या दानाचा मिशन कसा विनियोग करते, हे पारदर्शीपणे समाजापुढे मांडत असल्याबद्दल राज्यपालांनी रामकृष्ण मिशनचे कौतुक केले.

अगोदर बिझनेस क्लास आता इकॉनॉमी क्लासने प्रवास

पूर्वी आपण गारमेंट निर्यातदार असताना बिझनेस क्लासने प्रवास करीत असायचो. त्यावेळी पैसा स्वतःचा असायचा. परंतु राज्यपाल झाल्यानंतर आपण इकोनॉमी क्लासने प्रवास करतो कारण आपल्यासाठी खर्च होत असलेला पैसा जनसामान्यांचा आहे ही जाणीव आपण नेहमी बाळगतो असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.

रामकृष्ण मिशन मुंबईचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद यांनी स्वागतपर भाषण केले तर मिशनच्या धर्मादाय हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वामी दयाधिपानंद यांनी हॉस्पिटल तसेच युवकांसंबंधी उपक्रमाबद्दल अहवाल सादर केला. मिशनचे व्यवस्थापक स्वामी तन्नमानंद यांनी मिशनच्या बेलूर मठ येथे झालेल्या वार्षिक सभेच्या अहवालाचे वाचन केले.

रामकृष्ण मिशन मुंबईचे सहाय्यक सचिव स्वामी देवकांत्यानंद यांनी आभार प्रदर्शन केले. संयोजक शंतनू चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर विवेकानंद स्टडी सर्कलचे सदस्य डॉ हार्दिक गुप्ता व आराधना धार यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मिशनचे वरिष्ठ साधू तसेच विवेकानंद स्टडी सर्कलचे सदस्य व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. ००००

संबंधित पोस्ट

आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि इतर नेत्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली…

vishwatmaklokswamivarta

विधानसभा निवडणूक २०२४;जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कायदा व सुव्यवस्था आढावा

vishwatmaklokswamivarta

सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर नेणार – पालकमंत्री नितेश राणे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत विकासकामांचा शुभारंभ व लोकर्पण

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी बंगल्याच्या नूतनीकरणावर ४५ कोटी रुपये केले खर्च; भाजपचा आरोप

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठीमदरसांनी १५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta