vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

संभाव्य पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी ५ कोटी ६२ लाख‌ रुपये खर्चाचा आराखडा तयार १ हजार १६ गावे, वाड्यांचा आराखड्यात समावेश 

संभाव्य पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी ५ कोटी ६२ लाख‌ रुपये खर्चाचा आराखडा तयार १ हजार १६ गावे, वाड्यांचा आराखड्यात समावेश

 

राज्य प्रतिनिधी -रायगड जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज होत असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी ५ कोटी ६२ लाख ६८ हजार रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार करुन मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे. या आराखड्यात १ हजार १६ गावे व वड्यांवर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील काही गावांना एप्रिल, मे महिन्यात दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या पार्श्वभमीवर प्रशासनाने आत्तापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून, जिल्ह्याचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात विहिरी खोल करणे त्यामधील गाळ काढणे, टंचाईग्रस्त गावांना टँकर, बैलगाडीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणे, नवीन विंधन विहीर खोदणे, विंधन विहीर दुरुस्ती करणे या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १ हजार १६ गावे, वाड्यांवर संभाव्य पाणी टंचाईच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.

संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा दृष्टिक्षेप

उपाययोजना : गावे : वड्या : अपेक्षित खर्च

विहिरी खोल करणे गाळ काढणे : २४ : ४९ : ६० लाख १८ हजारटँकर, बैलगाडीने पाणी पुरवठा : १८६ : ५४० : ३ कोटी ५२ लाख ९२ हजार

नविन विंधन विहिरी : २७ : ८० : १ कोटी ३ लाख ६८ हजार विंधन विहिरींची दुरुस्ती : ३९ : ७१ : ४५ लाख ९० हजारजिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी पाण्याचा वापर जपून करावा, अपव्यय करू नये, पिण्याच्या पाण्याच्या मुख्य स्त्रोतां व्यतिरिक्त परिसरातील इतर उपलब्ध स्त्रोतांमधील पाण्याचा दैनंदिन वापरासाठी वापर करावा, पाणी स्त्रोत दूषित होणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यावी, कुठे पाणी पुरवठा पाइपलाइन फुटली असल्यास निदर्शनास आणून द्यावी.: डॉ. भरत बास्टेवाड,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड

संबंधित पोस्ट

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मिरवणुकांमध्ये प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईटच्या वापरास प्रतिबंध..

सार्वजनिक आणि सरकारी भागीदारीचा नवा अध्याय युवकांसाठी अद्ययावत प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा,आयटीआय आणि टोयोटाच्या उभारलेल्या प्रयोगशाळांचे मंत्री लोढा यांच्या हस्ते उद्घाटन छत्रपती संभाजीनगरसह नागपूर विभागातील अद्ययावत प्रयोगशाळांचे अद्ययावतीकरण,उद्योगांना पूरक प्रशिक्षण

पालघरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत …

भूमि अभिलेख विभागातील कर्मचा-यांचे प्रलंबित प्रश्नांवर कामबंद आंदोलन..

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगारमेळाव्यातून ४७८ उमेदवारांची निवड

vishwatmaklokswamivarta