vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती अभियानाचा गडचिरोलीत शुभारंभ

बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती अभियानाचा गडचिरोलीत शुभारंभ

 

गडचिरोली, प्रतिनिधी: ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या राष्ट्रीय अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जनजागृती अभियानाचा शुभारंभ  करण्यात आला.

कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या अभियानामुळे मुलींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळाल्याचे सांगितले. त्यांनी पीसीपीएनडीटी अंतर्गत कडक धोरण राबवून स्त्री भ्रुण हत्या रोखण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पाचखेडे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मुला-मुलींचे संतुलित गुणोत्तर समाधानकारक असल्याचे सांगत, स्त्री शिक्षण व सन्मान यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे नमूद केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी या महिनाभर चालणाऱ्या अभियानाची सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमात बाल कल्याण समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे महिलांसाठी हेल्पलाईन 181 आणि मुलींसाठी 1098 यासारख्या सेवांचा प्रचार करण्यात येणार आहे.कार्यक्रमाला संजीवनी विद्यालयाचे प्राचार्य जितेंद्र भैसारे, शिक्षक, व मान्यवरांनीही उपस्थिती दर्शवली. अभियानाद्वारे स्त्री-पुरुष समानता, शिक्षण आणि स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासाठी जनजागृतीचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन जयंत जथाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कवेश्वर लेनगुरे यांनी केले.यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, राज्यकर अधिकारी रविंद्र मिसाळ, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल्ल हुलके, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना इंगोले, शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार, बाल कल्याण समिती सदस्य काशिनाथ देवगडे व दिनेश बोरकुटे, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) श्रीमती ज्योती कडू, विनोद पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले, प्राचार्य जितेंद्र भैसारे, शिक्षक राकेश यामावार, हर्षाली ढोणे, आकाश सुर्वे व व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

महिला सक्षमीकरणाची दीपशिखा : श्रीम. सुषमा बालाजी गायकवाड यांची प्रेरणादायी कार्यगाथा

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय पोलीस क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज साकेत मैदान, ठाणे येथे संपन्न

लातूर जिल्ह्यातील तीनही नगरपरिषदांसाठी शांततेत मतदान,उदगीर नगरपरिषद निवडणुकीत 68.12 टक्के, अहमदपूरमध्ये 73.06 आणि औसा नगरपरिषदमध्ये 75.73 टक्के मतदान…

vishwatmaklokswamivarta

विकासाच्या प्रक्रियेत राज्य शासन-शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी – पालकमंत्री पंकजा मुंडे

शिवशक्ती आश्रम येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर संपन्न

vishwatmaklokswamivarta

श्रावण यात्रा काळात खाद्यपदार्थांच्या तपासणी करावी   – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश शाळेतील व परिसरातील अन्नपदार्थांची नियमित तपासणी करा श्रावण महिन्यात उपवासाचे पदार्थ विक्री करताना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा