vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सुकन्या समृद्धी खाते काढून मुलीचे भविष्य सुरक्षित करा- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन

सुकन्या समृद्धी खाते काढून मुलीचे भविष्य सुरक्षित करा-

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन

 

सांगली, प्रतिनिधी: सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या शिक्षणासाठी तसेच उज्वल भवितव्यासाठी फायदेशीर योजना आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेत आपल्या 10 वर्षाच्या आतील मुलीचे सुकन्या समृद्धी खाते काढून आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन सांगली डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक बसवराज वालिकार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

केंद्र शासनाने भारतीय टपाल विभागामध्ये सुकन्या समृद्धी योजना दिनाक 22 जानेवारी 2015 पासून सुरु केलेली आहे. यावर्षी या योजनेस दहा वर्ष पूर्ण झालेली असून सांगली जिल्ह्यातील अनेक पालकांनी आपल्या मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेले आहे. आजपर्यंत सांगली टपाल विभागात एकूण 93 हजार 235 खाती उघडलेली आहेत.

क्षेत्रीय स्तरावरती भारतीय टपाल विभागामार्फत महिला सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशन मोहिमेचा भाग म्हणून 10 वर्षाखालील मुलींची सुकन्या समृद्धी योजनेची खाती उघडण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये दिनांक 1 फेब्रुवारी 2025 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये जास्तीत जास्त सुकन्या समृध्दी योजनेची खाती उघडण्यात येणार आहेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी नागरिकांनी जवळच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. वालिकार यांनी केले आहे.00000

संबंधित पोस्ट

जम्मू-काश्मिरमध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन सलग चौथ्या दिवशी विस्कळीत,८ वैष्णोदेवी यात्रा भाविकांसाठी बंद  पूंछ आणि राजौरीत बेपत्ता झालेल्या ७ जणांचा शोध सुरू..

आजपासून देशभरात शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात, राज्यात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तिपीठांमध्ये उत्सवाचा प्रारंभ, पहिल्या दिवशी शैलपुत्री या रुपाची होत आहे आराधना.

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचा तात्काळ शासन सेवेत समावेश करा,बाबासाहेब कोलते यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी…

vishwatmaklokswamivarta

उद्योग पुरस्कार वितरण सोहळा-औद्योगिक विकासाला चालना;सुसज्ज कन्व्हेंशन सेंटर उभारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आंबेनळी घाट मार्गावरील वाहतूक सुरु

29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात “माहिती अधिकार दिन” साजरा होणार

vishwatmaklokswamivarta