vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सुकन्या समृद्धी खाते काढून मुलीचे भविष्य सुरक्षित करा- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन

सुकन्या समृद्धी खाते काढून मुलीचे भविष्य सुरक्षित करा-

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन

 

सांगली, प्रतिनिधी: सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या शिक्षणासाठी तसेच उज्वल भवितव्यासाठी फायदेशीर योजना आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेत आपल्या 10 वर्षाच्या आतील मुलीचे सुकन्या समृद्धी खाते काढून आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन सांगली डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक बसवराज वालिकार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

केंद्र शासनाने भारतीय टपाल विभागामध्ये सुकन्या समृद्धी योजना दिनाक 22 जानेवारी 2015 पासून सुरु केलेली आहे. यावर्षी या योजनेस दहा वर्ष पूर्ण झालेली असून सांगली जिल्ह्यातील अनेक पालकांनी आपल्या मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेले आहे. आजपर्यंत सांगली टपाल विभागात एकूण 93 हजार 235 खाती उघडलेली आहेत.

क्षेत्रीय स्तरावरती भारतीय टपाल विभागामार्फत महिला सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशन मोहिमेचा भाग म्हणून 10 वर्षाखालील मुलींची सुकन्या समृद्धी योजनेची खाती उघडण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये दिनांक 1 फेब्रुवारी 2025 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये जास्तीत जास्त सुकन्या समृध्दी योजनेची खाती उघडण्यात येणार आहेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी नागरिकांनी जवळच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. वालिकार यांनी केले आहे.00000

संबंधित पोस्ट

शिवाजी पुतळा येथे सहकार दिंडीचे ध्वजारोहण अर्जुन रावजी खोतकर व राजेश जी टोपे यांच्या हस्ते

vishwatmaklokswamivarta

विश्वमराठीसंमेलन उद्या २७ फेब्रुवारी पासून नाशिक येथे सुरू

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी, चारा टंचाई निवारणासाठी यंत्रणा सज्ज ठेवा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,एल-निनो प्रभाव व उपाययोजनांबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

सकारात्मक ऊर्जेला अधिक प्रवाहित   — जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर-श्री गुरु तेग बहादुर साहिबजी समागम कार्यक्रमाच्या प्रसारासाठी-जिल्ह्यातील सोशल मीडिया इंफ्लुएंसर यांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

एमएमआरडीएचा ४० हजार १८७ कोटींचा अर्थसंकल्प एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई महानगराच्या कायापालटास गती येणार

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी अर्ज करावेत