vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळप्रदेश

शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ महत्त्वाचे – प्रा. मोहन नेहरे  

शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ महत्त्वाचे – प्रा. मोहन नेहरे

         जालना प्रतिनिधी: नेहरू युवा केंद्र, जालना, पार्थ सैनिकी स्कूल आणि युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने पार्थ सैनिकी स्कूल, खरपुडी येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदरील स्पर्धा हि प्रणित सांगवीकर, जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. मोहन नेहरे यांनी खेळाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक विकासही होतो. नियमित खेळल्याने शरीर सशक्त होते, तर मानसिक तणाव दूर होतो. तसेच, खेळातून शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात.”

स्पर्धेच्या वेळी कबड्डी (पुरुष), खो-खो (महिला), 100 मीटर धावणे (महिला व पुरुष) आणि गोळा फेक (महिला व पुरुष) या विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. खेळाडूंनी आत्मविश्वास, कौशल्य आणि जिद्दीचे दर्शन घडवत उत्कृष्ठ कामगिरी केली.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना मेडल आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक योगेश बावसकर, सत्येंद्र बिश्त, सतीश गाभूड, जयपाल राठोड, अशोक शिंदे, भैय्यासाहेब ढवळे, शिवराज जाधव यांनी मेहनत घेतली.00000

संबंधित पोस्ट

तरुणांमध्ये नेतृत्त्वक्षमता विकसित करण्यासाठी विद्यापीठे, उद्योगसंस्थांमध्ये भागीदारीची गरज – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

मुंबई-गोवा महामार्गाची कामे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने करावीत,भुयारी मार्गानजीक असलेल्या रस्त्यांसाठी २१ कोटींची तरतूद,गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार,मुंबई-गोवा महामार्गाची उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठी राज्यस्तरीय समिती..

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शुक्रवारी सांगलीत,उरूण ईश्वरपूरमध्ये शनिवारी पदयात्रा…

vishwatmaklokswamivarta

शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते देशभरातल्या ६६ शिक्षकांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात स्थित पवित्र हेमकुंड साहिबचे दरवाजे उद्या भाविकांसाठी उघडण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी-प्रवेशिका पाठविण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta