vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कौटुंबिक न्यायालय सांगलीचा 5 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कौटुंबिक न्यायालय सांगलीचा 5 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

            सांगली, प्रतिनिधी: कौटुंबिक न्यायालय, सांगलीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त कौटुंबिक न्यायालय, सांगली येथे नांदा सौख्यभरे आयोजित करण्यात आला. कौटुंबिक न्यायालय सांगलीचा 5 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.

यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या माध्यमातून पुन्हा मनोमिलन होवून नांदवयास गेलेल्या जोडप्यांचा कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश सुनिता तिवारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी न्यायालयात पक्षकारांसोबत आलेल्या त्यांच्या बालकांना सोबत घेऊन दिप प्रज्वलन व रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरूवात झाली.

 अध्यक्ष स्थानावरून बोलताना न्यायाधीश सुनिता तिवारी यांनी कौटुंबिक वादाचे वैकल्पिक निवारण आणि जोडीला मुलांच्या हक्कांचे संगोपण, संस्कार जोपासण्याचे प्रतिपादन केले. यावेळी फुगे व फुलांनी न्यायालयाची सजावट करण्यात आली होती. सन्मान करण्यात आलेल्या पक्षकारांच्या मुलांच्या सोबतीने केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. श्री सुहास धोतरे यांनी गीत सादर केले.

  प्रस्तावना व संकल्पना कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक ज्योती बावले – भालकर यांनी केली. यावेळी जेष्ठ विधीज्ञ किरण पाटील, शकील पखाली, जयंत नवले, गणेश भोई, तेजस सन्मुख, शितल सावंत, पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र वायदंडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन संजय लोणकर यांनी केले. आभार सहाय्यक अधिक्षक शैलजा वेदपाठक यांनी मानले.

 कार्यक्रमास न्यायालयाचे प्रबंधक एस.व्ही. दांडेकर, विकास राऊत, महेश खटावकर, श्रृती दुधगांवकर, सुनिता चौगुले, प्रतिभा महाडीक, शरद चांदवले, सुहास धोतरे, तृप्ती फासे व अंगरक्षक अश्विन सोनेकर, महिला पोलिस नगिना पाटील तसेच विधीज्ञ व पक्षकार उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास निधी-उपलब्ध करुन देऊ- पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

नागरिकांना जलद सेवा पोहोचवण्यासाठी शासकीय सेवा ऑनलाईन देऊन नागरिकांचे जीवन सुखकर करा-महा आयटी कॉर्पोरेशन मुंबई चे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर

कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनचा उपक्रम; “डिजिटल शेती शाळा”

डिजीटल व्यवहार करताना सतर्क राहणे काळाची गरज- आशिष फुलुके- राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यशाळा उत्साहात

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची  राज्य सरकारची तयारी- उपमुख्यमंत्री अजित पवार

अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन समन्वयाने काम करावे-राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

vishwatmaklokswamivarta