vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कौटुंबिक न्यायालय सांगलीचा 5 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कौटुंबिक न्यायालय सांगलीचा 5 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

            सांगली, प्रतिनिधी: कौटुंबिक न्यायालय, सांगलीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त कौटुंबिक न्यायालय, सांगली येथे नांदा सौख्यभरे आयोजित करण्यात आला. कौटुंबिक न्यायालय सांगलीचा 5 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.

यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या माध्यमातून पुन्हा मनोमिलन होवून नांदवयास गेलेल्या जोडप्यांचा कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश सुनिता तिवारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी न्यायालयात पक्षकारांसोबत आलेल्या त्यांच्या बालकांना सोबत घेऊन दिप प्रज्वलन व रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरूवात झाली.

 अध्यक्ष स्थानावरून बोलताना न्यायाधीश सुनिता तिवारी यांनी कौटुंबिक वादाचे वैकल्पिक निवारण आणि जोडीला मुलांच्या हक्कांचे संगोपण, संस्कार जोपासण्याचे प्रतिपादन केले. यावेळी फुगे व फुलांनी न्यायालयाची सजावट करण्यात आली होती. सन्मान करण्यात आलेल्या पक्षकारांच्या मुलांच्या सोबतीने केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. श्री सुहास धोतरे यांनी गीत सादर केले.

  प्रस्तावना व संकल्पना कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक ज्योती बावले – भालकर यांनी केली. यावेळी जेष्ठ विधीज्ञ किरण पाटील, शकील पखाली, जयंत नवले, गणेश भोई, तेजस सन्मुख, शितल सावंत, पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र वायदंडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन संजय लोणकर यांनी केले. आभार सहाय्यक अधिक्षक शैलजा वेदपाठक यांनी मानले.

 कार्यक्रमास न्यायालयाचे प्रबंधक एस.व्ही. दांडेकर, विकास राऊत, महेश खटावकर, श्रृती दुधगांवकर, सुनिता चौगुले, प्रतिभा महाडीक, शरद चांदवले, सुहास धोतरे, तृप्ती फासे व अंगरक्षक अश्विन सोनेकर, महिला पोलिस नगिना पाटील तसेच विधीज्ञ व पक्षकार उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

मेळघाटातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत आहेत शासनाच्या योजना,धारणी तहसील कार्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन,शासन आपल्या दारी संकल्पना साकार; धुळघाटरोड येथे महसूल समाधान शिबिर

vishwatmaklokswamivarta

फलटणमध्ये शेतकरी व ग्रामपंचायतीच्या – १०० एकर क्षेत्रावर फळबाग व देशी वृक्ष लागवड-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहानाला उद्योग जगताचाही सकारात्मक प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार..

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के. ..

वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती,वाशिम जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम