vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कौटुंबिक न्यायालय सांगलीचा 5 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कौटुंबिक न्यायालय सांगलीचा 5 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

            सांगली, प्रतिनिधी: कौटुंबिक न्यायालय, सांगलीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त कौटुंबिक न्यायालय, सांगली येथे नांदा सौख्यभरे आयोजित करण्यात आला. कौटुंबिक न्यायालय सांगलीचा 5 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.

यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या माध्यमातून पुन्हा मनोमिलन होवून नांदवयास गेलेल्या जोडप्यांचा कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश सुनिता तिवारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी न्यायालयात पक्षकारांसोबत आलेल्या त्यांच्या बालकांना सोबत घेऊन दिप प्रज्वलन व रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरूवात झाली.

 अध्यक्ष स्थानावरून बोलताना न्यायाधीश सुनिता तिवारी यांनी कौटुंबिक वादाचे वैकल्पिक निवारण आणि जोडीला मुलांच्या हक्कांचे संगोपण, संस्कार जोपासण्याचे प्रतिपादन केले. यावेळी फुगे व फुलांनी न्यायालयाची सजावट करण्यात आली होती. सन्मान करण्यात आलेल्या पक्षकारांच्या मुलांच्या सोबतीने केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. श्री सुहास धोतरे यांनी गीत सादर केले.

  प्रस्तावना व संकल्पना कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक ज्योती बावले – भालकर यांनी केली. यावेळी जेष्ठ विधीज्ञ किरण पाटील, शकील पखाली, जयंत नवले, गणेश भोई, तेजस सन्मुख, शितल सावंत, पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र वायदंडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन संजय लोणकर यांनी केले. आभार सहाय्यक अधिक्षक शैलजा वेदपाठक यांनी मानले.

 कार्यक्रमास न्यायालयाचे प्रबंधक एस.व्ही. दांडेकर, विकास राऊत, महेश खटावकर, श्रृती दुधगांवकर, सुनिता चौगुले, प्रतिभा महाडीक, शरद चांदवले, सुहास धोतरे, तृप्ती फासे व अंगरक्षक अश्विन सोनेकर, महिला पोलिस नगिना पाटील तसेच विधीज्ञ व पक्षकार उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सेवेचा शुभारंभ, एकाच क्लिकवर मिळणार अर्जाची स्थिती व कर्ज मार्गदर्शन

सोलापूर आरटीओ कार्यालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय-तालुक्यात वाहन परवाना..

vishwatmaklokswamivarta

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास; ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी

प्रत्येक कुटुंबाची माहिती मोबाईल ॲपवर नोंदवून जनगणना केली जाईल     -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठी एक हजार गावांमध्ये एआयआधारित अर्लट यंत्रणा -वनमंत्री गणेश नाईक

सोयाबीन व भुईमूग या पिकांसाठी मूल्य साखळी भागीदार निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta