अडथळे दूर करून, बंध मजबूत करून: महिलांच्या कल्याणासाठी संवाद जागवणारा 10 वी आंतरराष्ट्रीय महिला परिषद..
आध्यात्मिक वार्ता
“ज्या राष्ट्र किंवा समाजातील स्त्रिया असंतुष्ट असतात, ते नेहमीच दारिद्र्यात राहतात,” असे जागतिक शांतता नेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी 10 व्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदच्या उद्घाटन भाषणात सांगितले.
या तीन दिवसांत, जीवनाच्या विविध क्षेत्रांतून एकत्र आलेल्या महिलांनी एक प्रभावी संवाद साधला—अडथळे पार करण्यावर, स्वतःला नव्याने उमगण्यावर आणि कल्याणाची कास धरण्यावर. या सत्रांमध्ये सखोल चर्चा, गहन विश्रांती, चिंतन आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती यांचे सुंदर मिश्रण होते, जिथे ज्ञान आणि प्रज्ञेचा संगम झाला आणि प्रेरणेचा मुक्त प्रवाह हृदयातून उमटला.
एका विशेष सत्रात, बहरीनच्या महिला लष्करी अधिकारी, एक भारतीय अभिनेत्री आणि तुर्कीतील डिजिटल आणि एआय-जनरेटेड आर्टमधील एक अग्रणी व्यक्ती यांनी मन आणि चेतनेवरील सर्जनशीलतेच्या भूमिकेवर संवाद साधला.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “लहानपणी माझ्यासाठी कला हे ध्यानासारखे होते—ते सहज प्रवाहित होत असे. इथे आल्याबरोबर माझ्या ऊर्जा स्तरात बदल जाणवला. जिथे लोक स्वतःला उन्नत करण्याचा प्रयत्न करतात, तिथे सर्जनशीलता बहरते.”
लष्कराच्या शिस्तबद्ध जीवनातून सर्जनशीलतेच्या मुक्त अवकाशात येण्याच्या आपल्या प्रवासाबद्दल बहरीनच्या जनरल स्पोर्ट अथॉरिटीच्या हेड ऑफ फॉलोइंग अँड कोऑर्डिनेटर मिस नूराह अब्दुल्ला यांनी सांगितले, “लष्करामध्ये सर्जनशीलतेला जागा नव्हती—आम्ही केवळ आदेशांचे पालन करत होतो. आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आल्यावर मला सृजनशीलतेची खरी स्वातंत्र्यता मिळाली आणि समजले की खरी सर्जनशीलता ही समाजाच्या सेवेसाठी असते.”
महिलांच्या जीवनातील विश्रांती आणि संतुलनाच्या महत्त्वावर भर देत आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या अध्यक्षा आणि प्रेरणाशक्ती श्रीमती भानुमती नरसिंहन यांनी सांगितले, “महिला म्हणून आपण अधिकाधिक मिळवण्याच्या आणि पूर्णत्वाकडे जाण्याच्या घाईत असतो. पण हा क्षण आहे शांत होण्याचा आणि फक्त असण्याचा. जेव्हा तुम्ही शांत आणि विश्रांत असता, तेव्हाच तुम्ही अधिक साध्य करू शकता.”
परिषदेच्या सारांशाचा विस्तार करत श्रीमती अमृता फडणवीस, समाजसेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या, यांनी सांगितले, “ही परिषद म्हणजे स्वतःला त्या सर्व बंधनांपासून मुक्त करण्याचा प्रवास आहे, जी आपल्याला मानसिकरीत्या अडकवतात. जेव्हा या बंधनांपासून मुक्ती मिळते, तेव्हा मन ज्या गोष्टीचा विचार करू शकते, त्या सर्व साध्य करता येतात.”
*लाखो लोकांना आंतरिक शांती मिळवून दिल्याबद्दल गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना आदरांजली*
परिषदेत उपस्थित अनेक दिग्गजांनी जागतिक शांतता नेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी १८० देशांतील कोट्यवधी लोकांमध्ये मनःशांती रुजवण्यात निभावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची कबुली दिली. भारताच्या सन्माननीय राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुदेवांच्या अध्यात्मिक मूल्यांच्या संवर्धनातील योगदानावर प्रकाश टाकत सांगितले, “भारत हा आध्यात्मिक देश आहे, परंतु काळ बदलत असताना आपण आपल्या मूळ तत्त्वांपासून दूर जात आहोत. म्हणूनच, गुरुदेवांसारखे अध्यात्मिक नेते आपल्या विस्मरणात गेलेल्या मूल्यांची आठवण करून देण्यासाठी आणि आपल्याला प्रेरणा देण्यासाठी येथे आहेत.”
माजी केंद्रीय शिक्षणमंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी प्रतिष्ठित विशालाक्षी पुरस्कार स्वीकारताना आपल्या भावना व्यक्त केल्या, “एका संताला जन्म देणाऱ्या मातेला समर्पित पुरस्कार मिळण्याइतकी दुसरी कोणतीही अधिक सन्मानाची गोष्ट असू शकत नाही.”
जपानच्या माजी फर्स्ट लेडी, मान. अकीए अबे यांनी गुरुदेवांच्या अहिंसापूर्ण विश्वाच्या दृष्टिकोनाशी सहमती दर्शवत आपल्या वैयक्तिक दु:खावर प्रकाश टाकला:”मी गुरुदेवांना म्हणताना ऐकले आहे की प्रत्येक गुन्हेगाराच्या आत एक पीडित असतो. ज्याने माझ्या पतीचे जीवन संपवले, त्या व्यक्तीबद्दल द्वेष करण्याऐवजी, मी त्याच्यासाठी करुणा ठेवू शकते का? मी अशा हिंसाचारास रोखण्यासाठी काही करू शकते का? गुन्हा घडल्यानंतर केवळ पीडितांना मदत करणाऱ्या समाजापेक्षा कमी गुन्हेगारी असलेला समाज नक्कीच अधिक चांगला आहे.”
सीता चरितम्: एक सांस्कृतिक आणि दृश्यात्मक भव्यता-10 वी आंतरराष्ट्रीय महिला परिषद ही संवाद आणि आत्मचिंतनाने समृद्ध असण्यासोबतच एक सांस्कृतिक अभिव्यक्तीचे व्यासपीठ देखील ठरली. याचा सर्वोत्तम अनुभव सीता चरितम् या भावस्पर्शी नाट्यप्रस्तुतीत पाहायला मिळाला. रामायणाच्या या अजरामर गाथेचे माता सीतेच्या दृष्टिकोनातून काव्यात्मक सादरीकरण झाले, जिथे निर्व्याज प्रेम, प्रज्ञा, धैर्य, भक्ती आणि शालीनता यांचा अतूट संगम होता.
भारताच्या पहिल्या इमर्सिव्ह 4D म्युझिकल बॅले म्हणून सादर झालेल्या या भव्य नृत्यनाट्यात ५०० कलाकारांनी ३० विविध नृत्य, संगीत आणि कलाप्रकार एकत्र साकारले. या अद्वितीय प्रस्तुतीने जागतिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.