जालना / प्रतिनिधी- दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील वटवृक्ष हनुमान मंदीरात दि. ५ ते १२ एप्रिलदरम्यान हनुमान जन्मोत्सव सोहळा आणि अखंड रुद्र जलधारा अभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे.गत २४ वर्षापुर्वी स्व. मोहन महाराज फुलंब्रीकर यांनी अखंड रुद्र जलधारा अभिषेकाची परंपरा सुरु केली होती. अंध्दश्रध्दा आणि अनिष्ठ रितीरिवाज निवारण्यासाठी या सोहळ्यात दरवर्षी रुद्राअभिषेक करण्यात येत असून, दिवसरात्र ११ ब्राह्मणांच्या माध्यमातून गणपती, महादेव, देवी, हनुमान पंचायतन करण्यात येते. विश्वशांती, जनकल्याण, नैसर्गीक आपत्ती निवारणार्थ या सप्ताहात समाजातील सर्वधर्मियांकडून सेवा केली जाते. दररोज सायंकाळी ७ वाजता प्रदोष पुजेचे आयोजन करण्यात आले असून, मुख्य यजमान अॅड. संजय देशपांडे, महिकोचे राजेंद्र बारवाले, सुरेश अग्रवाल, भास्करराव दानवे, अशोक पांगारकर, चक्रधर खोतकर, डॉ. संजय राख, डॉ. पद्माकर सबनीस, डॉ. निरज परीतकर, वैद्य मंगल शुक्ला, सत्यनारायण भारुका, भावेश पटेल, अरुण अग्रवाल, संजय अग्रवाल, जितेंद्र पित्ती, मदन लाड, भुपेश केनीया, संजय खिस्ते, अॅड. जगदीश बडवे, अॅड. बलवंत नाईक, अॅड. विष्णुपंत किनगावकर, किरण काळे, पुष्कर आंबेकर हे आहेत. तर वेशासं विनायक महाराज फुलंब्रीकर, वेशासं विजय महाराज फुलंब्रीकर, शलीकराम म्हस्के, अतूल वझरकर, अरविंद भोसले, दिनेश फलके, प्रल्हाद हरबक, श्रीनिवास इंदानी, महेश रत्नपारखी, धिरज मेवाडे, रुपेश हुंडीवाले, लक्ष्मीकांत नाईक, शंकर लुंगे, अॅड. ललीत हट्टेकर, आनंद मोहिते, संजय भालेराव, गणेश सुपारकर, सतीष लाड, मकरंद जहागीरदार, त्र्यंबक देशमुख, वेदांत फुलब्रीकर, संजय पातेकर यांचे सोहळ्यासाठी विशेष सहकार्य लाभत असल्याचे संयोजकांनी सांगितले.