vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रयागराज महाकुंभवर काय म्हणाले ते पहा वादग्रस्त विधान..

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रयागराज महाकुंभवर काय म्हणाले ते पहा वादग्रस्त विधान..

 

राज्य प्रतिनिधी –

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रयागराज महाकुंभवर वादग्रस्त विधान केले आहे. मौनी अमावस्येला महाकुंभ येथे झालेल्या चेंगराचेंगरीवर टीका करताना त्यांनी ‘महाकुंभ आता मृत्युच्या कुंभात बदलला’, असे म्हटले आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला

महाकुंभात व्हीआयपींना सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत. पण गरिबांकडे दुर्लक्ष केले जात आहे. महाकुंभात येणाऱ्या भाविकांना सुविधा नाकारल्या जात आहेत. महाकुंभात भाविकांची गर्दी, प्रयागराज संगम स्टेशन बंद होणे आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी यावरून त्यांनी योगी सरकारवर कडाडून टीका केली त्यांनी सरकारवर गैरव्यवस्थापनाचा आरोप केला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की महाकुंभ आता मृत्युकुंभात रूपांतरित झाला आहे. व्हीआयपी लोकांना सुविधा पुरवल्या जात आहेत. परंतु सर्वसामान्यांसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूंनंतर मृतदेह शवविच्छेदन न करता बंगालला पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

येत्या महाशिवरात्रीला महा कुंभाच्या स्नानाचा शेवटचा दिवस असणार आहे त्यामुळे आता गर्दी ही वाढू लागली आहे त्याला नियंत्रित करण्याचे काम उत्तर प्रदेश सरकारही करू लागली आहे सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कोणतेही अनुसूचित दुर्घटना घडू नये याचीही सतर्कता यावेळी घेण्यात येत आहे असल्याचे प्रशासनाकडून कळते.

संबंधित पोस्ट

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी· प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन· व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी..

vishwatmaklokswamivarta

दिवंगत शिवाजीराव देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन

एसटीच्या खासगीकरणाची कितीही अफवा उठवा, आंदोलन सुरूच राहणार; सदाभाऊ खोत यांचा इशारा

vishwatmaklokswamivarta

भारत-चीन विवाद संपुष्टात !  दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दोन्ही देशांमध्ये होणार मिठाईची देवाणघेवाण, लवकरच केली जाणार गस्त

vishwatmaklokswamivarta

सोलापूर- दिल्ली के के एक्सप्रेसमध्ये शॉर्टसर्किट मुळे भडकली आग; चालक जखमी, प्रवासी सुखरूप…

पंतप्रधान मोदी आज नेपाळ दौऱ्यावर; अनेक करारांवर होणार स्वाक्षरी