vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जयभीमनगर प्रकरणी कारवाई न करणाऱ्या एसआयटीला न्यायालयात खेचून सरकारला घेराव घालणार- विशाल माने, अध्यक्ष युवा भीमसेना संघटना

जयभीमनगर प्रकरणी कारवाई न करणाऱ्या एसआयटीला न्यायालयात खेचून सरकारला घेराव घालणार- विशाल माने, अध्यक्ष युवा भीमसेना संघटना

 

( सुरेश गायकवाड )-मुंबई- पवईच्या जयभीम नगरातील हजारो लोकांच्या घरावर बेकायदेशीररित्या कारवाई करून त्यांना बेघर करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांवर आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई न करणाऱ्या एसआयटीला न्यायालयात खेचून सरकारला घेराव घालणार असल्याचा इशारा युवा भीमसेना संघटनेचे अध्यक्ष विलास माने यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

   दि.६ जून २०२४ रोजी मनपाच्या एस विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने जयभीम नगरातील झोपड्यांवर कारवाई केली. ही कारवाई करण्यासाठी कुणाही विभागाचे आदेश देण्यात आले नव्हते तरी देखील मानवी हक्क आयोगाचे आदेश आहे असे भासवून येथील रहिवाशांना बेघर केले. त्यामुळे रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली असता कोर्टाने एसआयटी गठीत करून या समितीचे प्रमुख शशी कुमार मीना यांना संबंधित घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितला असता त्यांनी सदर घटनेचा अहवाल न्यायालयात सादर करून संबंधित घटनेसंबंधी महापालिकेकडे कारवाई करण्यासाठी कोणताही ठोस आदेश नव्हता असे अहवालात स्पष्ट केले. त्यामुळे न्यायालयाने एसआयटीला संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले तरी देखील एसआयटीने अद्यापही कारवाई केली नाही

त्यामुळे या अन्यायाविरोधात युवा भीमसेना आठवड्यात सरकारला घेराव घालणार असल्याचा इशारा देऊन एसआयटीला न्यायालयात खेचणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

ठाण्यात कोडीनयुक्त कफ सिरपच्या (ड्रग्ज) 17,640 बाटल्या जप्त; पाच जणांना अटक.

vishwatmaklokswamivarta

आमदार श्रीम.चित्रा वाघ यांनी नमुंमपा घणसोली बेघर निवारा केंद्राची पाहणी करीत व्यक्त केले समाधान

vishwatmaklokswamivarta

माहीम नवरंग कंपाऊंड येथे लागली भीषण आग…

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जमाती कल्याण समितीचा आजपासून दौरा सुरू*विविध विभागांचा घेतला आढावा

कोविडबाबत नमुंमपा आरोग्य विभाग दक्ष – रूग्णालयांत राखीव बेड्स नियोजन नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घेण्याचे व वैयक्तिक स्वच्छता बाळगण्याचे आवाहन

पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातर्फे अकोला येथे तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन,शिवार फेरीचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा-कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणाचे शेतकऱ्यांना आवाहन

vishwatmaklokswamivarta