vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

डेबुजी परिट समाज जालना आणि गुरू शिष्य परिवाराचा आगळा वेगळा उपक्रम–अमरधान स्मशाभूमीतील संत गाडगेबाबा शांतीवनाचे लोकार्पण @ संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर, मान्यवरांना पुरस्कार, स्वच्छतादुतांचा सत्कार

डेबुजी परिट समाज जालना आणि गुरू शिष्य परिवाराचा आगळा वेगळा उपक्रम–अमरधान स्मशाभूमीतील संत गाडगेबाबा शांतीवनाचे लोकार्पण @ संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर, मान्यवरांना पुरस्कार, स्वच्छतादुतांचा सत्कार

—————————————-

जालना (प्रतिनिधी) शहरातील नवीन जालना भागातील अमरधाम स्मशानभूमीत (शेरी) श्रमदानाच्या माध्यमातून कायापालट करून तेथे झाडे लावून, भिंतीची रंगरंगोटी करून त्यावर सुंदर सुविचार लिहून तेथे छोटेसे शांतीवन उभारून अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना बसण्याची चांगली व्यवस्था केलेल्या संत गाडगेबाबा शांतीवनाचे लोकार्पण आज रविवारी (दि.२३) राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले. डेबुजी परिट समाज जालना आणि गुरू शिष्य परिवाराच्या संयुक्त विद्यमाने छोटेखानी सोहळा स्मशानभूमीत साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा तसेच स्मशानभूमीत श्रमदान करून स्वच्छता राखणाऱ्या स्वच्छतादुतांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यानिमित्त स्मशानभूमीत रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी ३० दात्यांनी रक्तदान करून मानवतावादी कार्यास हातभार लावला.अमरधाम स्मशानभूमीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा परीट समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष सुभाषराव वाघमारे हे होते तर बदनापूरचे माजी आ. संतोष सांबरे, प्रसिध्द कवयित्री संजिवनी तडेगावकर, प्रसिध्द साहित्यिक प्रा. बसवराज कोरे, पंडीतराव लव्हटे, परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष किशोर आगळे, लोकमान्य शाळेचे मुख्याध्यापक विजय उबरहंडे, निलेश नन्वरे, श्रीमती करूण हिवाळे, श्रीमती उबरहंडे, डेबुजी समाज आणि गुरू शिष्य परिवारचे संस्थापक किशोर खंडाळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त सकाळच्या सत्रात जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी दोन्ही परिवारातील ३० सदस्यांनी रक्तदान केले. त्यानंतर दुपारच्या सत्रात मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे श्रीमती मिना इंगळे, श्रीमती लता मेव्हणकर, मिना वाघमारे, किशोर खंडाळे, गणेश इंगळे, रमेश पैठणकर, हर्ष मेव्हणकर, अरूण सुरूसे यांनी स्वागत केले. त्यानंतर अरूण सुरसे, लक्ष्मण उजेड, मच्छिंद्र उजेड, शिवराज उजेड, दिनेश उजेड, योगेश वाघमारे, बळीराम मोरे, चंद्रशेखर ठाकुर, रामेश्वर फड यांचा आदर्श परिवार सदस्य म्हणून तर संत गाडगेबाबा शांतीवनात सुविचार अंकीत करणारे पेंटर तथा गायक शेख जमील यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना प्रसिध्द कवयित्री डॉ. संजिवनी तडेगावकर यांनी खंडाळे गुरूजी यांच्या कार्याचे कौतूक करून स्मशानभूमीतील कार्य निष्काम असल्याचे सांगून सर्वांनी या कार्याला साथ देवून सातत्य टिकवून ठेवावे, असे आवाहन केले. माजी आ. संतोष सांबरे यांनी स्मशानभूमीतील या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे कौतुक करीत आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच स्मशानभूमीत एखाद्या कार्यक्रमाचे भाषण करीत असल्याचे सांगितले. संत गाडगेबाबांच्या पंचसुत्रीचा सर्वांनी अंगिकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. बसवराज कोरे यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्याची आठवण करून देत बाबा हे आपल्या आयुष्याची प्रेरणा असून आपल्या जडणघडणीत त्यांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव असल्याचे ते म्हणाले.

: यावेळी अमरधाम स्मशानभूमीत नियमीत श्रमदान करून परिसर स्वच्छ राखण्यात मोलाची भूमिका बजावत असल्याबद्दल रमेश पैठणकर,रोषण इंगळे, सचिन शिंदे, सचिन शेलार, गणेश मेव्हणकर, नकुल राऊत, विवेक पाटील, रामदास हजारे, गणेश वाघमारे, निलेश नन्नावरे, संतोष रेगुडे यांचाही शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्तविक सुनिल ढाकरके यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गौतम मोरे यांनी केले तर योगेश मोरे यांनी आभार मानले. यावेळी अशोकराव खंडाळे,सुरेशराव वाघमारे, अशोकराव जाधव, अनिल खंडाळे,काशिनाथ मेव्हणकर, संतोष शिंदे, जगतकुमार घुगे,सुभाष घोडके, डिगंबर जाधव, संजय आगळे, बाबासाहेब उजेड,ज्ञानेश्वर निक्कम, सोमेश कोळी, अविनाश कुलकर्णी, प्रदीप देशपांडे, गोपाल शिंदे, जालिंदर लाड, बाबासाहेब ओळेकर, राजेश शेलार,अतुल खंडाळे, कल्पना पेंटेवाड,श्रीमती करुणा हिवाळे यांच्यासह डेबुजी समाज जालना आणि गुरू शिष्य परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्मशानभूमीत रंगली मैफल———–एरव्ही स्मशानभूमी म्हटलं की, दुख व्यक्त करण्याची जागा असते, सहसा स्मशानभूमीत कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम घेतले जात नाहीत. परंतू डेबुजी समाज जालना आणि गुरू शिष्य परिवाराचे संस्थापक किशोर खंडाळे गुरूजी यांनी पुढाकार घेत सर्वांच्या सहकार्याने अमरधाम स्मशानभूमीतील पडीत असलेल्या जागेचे रूपांतर सुंदर अशा बागेत केले. अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी बसण्याची निवांत जागा, चोहीकडे झाडे, शोभीवंत फुले, रंगरंगोटी केलेल्या भिंती, भिंतीवरील सुविचार, पशु पक्ष्यांसाठी दानापाण्याची सोय अशी सर्व व्यवस्था असलेल्या संत गाडगेबाबा शांतीवनाची उभारणी केली. या शांतीवनाच्या लोकार्पण प्रसंगी माजी आ. संतोष सांबरे यांनी सुंदर मराठी भावगीत, कवयित्री डॉ. संजिवनी तडेगावकर यांनी सुंदर कविता आणि पेंटर शेख जमील यांनी गझल गावून स्मशानभूमीत जणू मैफलच रंगविली. सर्वांनी या मान्यवर कलावंतांना भरभरून दाद दिली.

संबंधित पोस्ट

राजूर येथील कावीळ साथ रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पणन विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा

vishwatmaklokswamivarta

अमरावती शहरात ५ सप्टेंबर रोजी वाहतूक नियमांमध्ये बदल..

vishwatmaklokswamivarta

आगामी अधिवेशनात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष विधेयक मांडणार- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार· केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्यस्तरीय ‘जेंडर रिसोर्स सेंटर’ स्थापन करणार

साहित्य अकादमीचे बाल साहित्य व युवा साहित्य पुरस्कार २०२६ साठी आवाहन; पुस्तकांच्या नोंदणीला सुरुवात

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या भित्तिपत्रकाचे अनावरण