न्याय न मिळाल्यास संसद भवन येथे आत्मदहन करणार – मंगल सुंदरदास बैष्णव बैरागी
मुंबई प्रतिनिधी –
मुंबई- नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील मौजे धर्माबाद गावातील देवस्थानाची जमिन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन रात्रौच्या वेळेस घरात घुसून जबरदस्तीने शंभर रुपयांच्या कोर्ट स्टॅम्पपेपरवर सही घेऊन जमीन हडप करून ती जमिन बेकायदेशीरपणे विकणाऱ्या मावस सासूबाईंची मुले आणि त्या गावातील दलाल यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आणि प्रशासकीय विभागांना मंगल बैष्णव बैरागी यांनी साकडे घातले आहे. त्यांच्या मागणी न्याय न मिळाल्यास त्या संसद भवन येथे आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी सांगितले की, देवस्थानाची इनामी जमिन त्यांची सासूबाई सुमनबाई विठ्ठलदास बैरागी यांच्या नावे वडिलोपार्जित असताना त्या जमिनीचा बेकायदेशीर ताबा घेऊन ती जमीन बेकायदेशीरपणे विकून टाकली. आणि त्या जमिनीवर अनधिकृतपणे दोन मजली इमारत बांधली आहे. मग, त्या बांधकामाला व जमिन विकण्यास कुणी परवानगी दिली असा प्रश्न त्यांनी विचारला आहे
सदर अन्यायप्रकरणी न्याय मिळावा यासाठी दि. ५ ऑगस्ट २०२४ रोजी आझाद मैदान येथे उपोषण केले असता उपोषण मागे घ्यावे याकरिता ७/१२ पत्रकी आमच्या वारसदारांची नोंदी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले होते परंतु अद्यापही त्यांचेवर कारवाई करण्यात आली नाही असे त्यांनी सांगितले.
घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून नवरा अपंग असून मुलगा ही गतिमंद आहे, तरी संबंधित प्रकरणी न्याय दयावा अशी मागणी त्यांनी रडता रडता केली आहे.