vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मीरा-भाईंदर येथील मेट्रो -9 उडाणपुल क्र.2 चेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

मीरा-भाईंदर येथील मेट्रो -9 उडाणपुल क्र.2 चेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

ठाणे, प्रतिनिधी:- मीरा-भाईंदर येथील मेट्रो -9 उडाणपुल क्र.2 चे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

या मेट्रो उडाणपूल क्र.2 चे प्रमुख वैशिष्टे हे स्थळ एस स्टोन जंक्शन जवळील साई बाबा नगर मेट्रो स्थानकापासून सुरु होऊन शिवार गार्डनपर्यंत सुमारे 850 मीटर लांबीचा आहे. या मेट्रो उड्डाणपूलास 21 खांब आहेत. तर पोहोच अप रस्त्याची लांबी 122.6 मिटर तर पोहोच रस्त्याची डाऊन लांबी 15.3 मिटर आहे. उडाणपुलाच्या वाहतूक मार्गाची रुंदी 17 मीटर एवढी आहे. ज्यामध्ये दोन लेन आहेत. यामध्ये सायनेजेस, स्पीड ब्रेकर आणि कॅट आइज तरतूद करण्यात आली. सुरक्षिततेकरिता आरसीसीचे क्रॅश प्रतिबंधक बनविण्यात आले. सुरळीत नेव्हीगेशन परावर्तित चिन्हे, लेन खुणा आणि वेग मर्यादा निर्देशक बसविण्यात आले आहेत. पाणी साचणे टाळण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आली आहे. डाऊन स्ट्रीम रॅम्पवर वाहनाचा वेग नियत्रिंत करण्यासाठी रंबल स्ट्रिप्स आणि स्पीड बसविण्यात आले आहेत.एस स्टोन जंक्शन जवळील साई बाबा नगर मेट्रो स्थानकापासून सुरु होऊन शिवार गार्डन जंक्शन पर्यंत तीन जंक्शनची कोंडी कमी करणे हा या मार्गाचा उद्देश आहे. उडाणपूलामुळे सिग्नलवर होणारी वाहतूकीची गर्दी कमी होईल. तर वाढत्या वाहतूकीच्या मागण्यांना संबोधित करुन एक महत्वपूर्ण पायाभूत सुविधा अपग्रेड म्हणून काम होईल.

00000

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यातील हाऊसिंग सोसायटी इमारतीवरील मोबाईल टॉवर काढणार- मंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याला आणि पावसाला जोरदार सुरुवात 🌧️ ♦️जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

ग्रामीण भूमिहीन लाभार्थ्यांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ द्यावा-ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे,मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत 72 हजार घरकुल पूर्ण…

vishwatmaklokswamivarta

पुरग्रस्त शेतकऱ्यांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडन महाराष्ट्राला विशेष पॅकेज मिळवून देणार -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**धाराशिव बीड जालना येथील पूरग्रस्त गावांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी* 

vishwatmaklokswamivarta

आदिवासी भागाच्या विकासासाठी ‘सीएसआर फॉर चेंज’ उपक्रम

vishwatmaklokswamivarta

कृषी भागाची नऊ क्षेत्रिय कार्यालये झाली आयएसओ मानांकन*