स्थिर व आशादायी, सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प- रावसाहेब पाटील दानवे
जालना (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला सर्व क्षेत्राला न्याय देणारा कृषी, औद्योगिक, महिला व युवा यांना न्याय देणारा अर्थसंकल्प असून मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत, सामान्य जनतेच्या आशा व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करण्यात आलेली आहे यासाठी मी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली आहे.