vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य पैशाची मागणी केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा    – उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण

आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य पैशाची मागणी केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा    – उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण

सातारा प्रतिनिधी: लोकसंख्येच्या निकषानुसार आपले सरकार सेवा केंद्र वितरीत कर्यात येते. सदर तरतूदींनुसार सातारा जिल्ह्यामध्ये १ हजार १५२ आपले सरकार सेवा केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वितरीत करण्यात येणार आहेत. आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देण्याबाबत कोणत्याही प्रकारची शासकीय फी स्वीकारली जात नसून संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी पडून त्रयस्थ व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहार करु नयेत. तसेच याकामासाठी कोणी पैशांची मागणी केल्यास तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी केले आहे.

आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्रामपंचायत व नगरपंचायतीच्या भौगोलिक क्षेत्रातील CSC-SPV कडे ऑनलाईन नोंदणीकृत CSC केंद्रचालकांकडून आणि CSC-SPV चे केंद्र मिळवण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागविणेत आलेले आहे.

 अर्ज सादर करणेची अंतिम मुदत दिनांक २१/०३/२०२५ होती. त्यानूसार एकूण २ हजार ३२ आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज दाखल झालेले आहेत.

  आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देण्याबाबत कोणत्याही प्रकारची शासकीय फी स्वीकारली जात नसून संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी पडून त्रयस्थ व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहार करु नयेत. तसेच याकामासाठी कोणी पैशांची मागणी केल्यास या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. याबाबत कोणत्याही स्वरुपाची तक्रार प्राप्त झाल्यास त्यास जिल्हाधिकारी कार्यालय व कार्यालयातील अधिकारी , कर्मचारी जबाबदार राहणार नाहीत असेही उपजिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी कळविले आहे.

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या मुख्यमंत्री विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या श्री मोरया प्रतिष्ठान च्या गणेश सभा मंडपाचे  उद्घाटन

शिवजयंतीनिमित्त आज ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रा

vishwatmaklokswamivarta

राज्यातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतिहारी येथे ७,२००कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनकेले

अनुसूचित जाती व जमातीतील मृतांच्या १०८ वारसांना लवकरच शासकीय नोकरीचा आदेश ; प्रक्रिया अंतिम टप्प्यात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विभागीय दक्षता समितीच्या बैठकीत माहिती

जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी डिजीटल प्रक्रियेत अधिक अद्ययावतीकरणाचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश