vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा

 

राज्य प्रतिनिधी -प्रशासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्राप्त निधी विहित मुदतीत 100 टक्के खर्च करावा. केलेली कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असावीत, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजना) संबंधी आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह जिल्हास्तरीय प्रमुख यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते

प्रशासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्राप्त निधी विहित मुदतीत 100 टक्के खर्च करावा. केलेली कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असावीत, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

राज्य, जिल्हा परिषद व महापालिका, नगरपालिका स्तरावरील कार्यान्वयीन यंत्रणांना निधी वितरण, वितरित निधीचा यंत्रणानिहाय खर्च आदिंचा तपशीलवार आढावा घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उर्वरित अल्प कालावधीत यंत्रणांनी आपल्याकडील 100 टक्के निधी खर्च करावा. जिल्हा नियोजन समितीतून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करताना प्रशासकीय व आर्थिक शिस्त पाळावी. राज्य व स्थानिक स्तरीय यंत्रणांनी 31 मार्च 2025 पूर्वी त्यांचा संपूर्ण खर्च होईल याची दक्षता घ्यावी. विहित मुदतीत निधी खर्च करून राज्यात उत्तम स्थान पटकवावे, असे त्यांनी निर्देशित केले.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी रस्त्यांची कामे, साकव यासारखी कामे दर्जेदार करावीत. काम सुरू करण्यापूर्वी व पूर्ण झाल्यानंतर जिओ टॅगिंग करावे, असे सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन

महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या फिश मार्केटच्या वास्तूचे काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावे. हे फिश मार्केट सर्व सोयीसुविधांनीयुक्त होण्यावर प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी भर द्यावा, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे-फिश मार्केटच्या वास्तूचे भूमिपूजन संपन्न

vishwatmaklokswamivarta

शिक्षण आणि तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागाचा कायापालट शक्य- उपराष्ट्रपती जगदीप धनखड· विकसित भारत केवळ स्वप्न नव्हे तर निश्चित साध्य· के.पी.बी हिंदुजा महाविद्यालयाचा अमृत महोत्सव

सातारा येथील चतुर्थ मंदिर परिषदेसाठी राज्यभरातून ११०० हून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती !*हिंदूंच्या प्रथा-परंपरा कुणी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, तर सरकार कठोर कारवाई करेल* *मंदिरे आणि गडकिल्ले यांवरील मंदिरांवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी प्रसंगी ‘बुलडोझर’ कारवाई !**मंदिरांच्या सर्व समस्यांसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन त्यावर तोडगा काढू ! -* भरतशेठ गोगावले, फलोत्पादन आणि रोजगार हमीमंत्री

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात रेड अलर्ट; सात हजाराहून अधिक नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले ; बाधित लोकांना अन्न धान्यासह जेवणाचीही केली सोयपालकमंत्री ना. पंकजाताई मुंडेंनी कलेक्टर व प्रशासनाचे केले अभिनंदन; जिल्ह्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष

vishwatmaklokswamivarta

परभणी जिल्ह्याच्या विकासाला गती; विविध योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण बदल – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर