vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत ठाणे जिल्ह्याचे यश..

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत ठाणे जिल्ह्याचे यश..

 

ठाणे प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे)- विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने भारत सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरु करण्यात आली आहेत. या विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सी. बी. एस. सी. ई पॅटर्न च्या धर्तीवर बारावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. तर‌ संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण‌ भागातील विद्यार्थ्यांच्या ३० जागांपैकी शहापूर तालुक्यातील – २१ पात्र विद्यार्थी, मुरबाड तालुक्यातील – ०१ पात्र विद्यार्थी, भिवंडी तालुक्यातील- ०१ पात्र विद्यार्थी असे एकूण – २३ पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत ३० जागांपैकी २३ जागेवर पात्र विद्यार्थ्यांची निवड झाली आणि शहापूर तालुक्यातील २१ विद्यार्थ्यांची निवड झाली ही आनंदाची बाब आहे. या सर्व विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या आहेत.

  ठाणे व पालघर जिल्ह्यासाठी नवोदय विद्यालयात इयत्ता ६ वी च्या एकूण ८० जागा आहेत. त्यापैकी ६० जागा ग्रामीण भागासाठी व २० जागा शहरी भागासाठी असतात. यात ठाणे जिल्ह्यासाठी ग्रामीण भागासाठी ३० जागा व शहरी भागासाठी १० जागा राखीव असतात. संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३० जागांपैकी २३ पात्र विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

    सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी (शिक्षण), गटशिक्षाधिकारी या सर्वांना शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

000

संबंधित पोस्ट

गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद शांततेत साजरे करून सामाजिक एकोपा जपूया !-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे• शांतता समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा..

5 रुपयांच्या नोटा व 20 रू.ची नाणी कायदेशीर चलन; स्वीकार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नृत्यांगना गौतमी पाटीलवर मरगळे कुटुंबीयांचा गंभीर आरोप, कारने रिक्षाला धडक दिल्यानंतर चौकशी तर सोडाच पण…

पाण्याविषयक तक्रारी 1800222309 टोल फ्री क्रमांकावर नोंदविण्याचे महापौर श्रीम.सुजाता पाटील यांचे आवाहन

जालना जिल्ह्यातील बदनापूर कृषी संशोधन केंद्रास सर्व अर्थसहाय्य- कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

राष्ट्रीय एकता ग्रूप द्वारा संचालित एकता कोचिंग क्लास याचा गॅदरिंगसमारोह चा उद्घाटन माजी राज्य मंत्री व जालना जिल्ह्याचे लोक प्रिय आमदारअर्जुन भाऊ खोतकर साहेब यांच्या हस्ते.

vishwatmaklokswamivarta