vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

म्यानमार आणि थायलंडमध्ये ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपात २५ जणांचा मृत्यू, ४३ जण बेपत्ता…

म्यानमार आणि थायलंडमध्ये ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपात २५ जणांचा मृत्यू, ४३ जण बेपत्ता…

 

विदेश प्रतिनिधी-

बँकॉक/नेपिडो: म्यानमारच्या सागाईंग प्रदेशात ७.७ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपात म्यानमारमध्ये किमान २५ जणांचा मृत्यू झाला, तर थायलंडमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत या आपत्तीत कोसळल्याने ४३ कामगार बेपत्ता झाले आहेत.

🔹 भारताचा प्रतिसाद:भारत सरकारने परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करून सर्वतोपरी मदत देऊ केली आहे. पंतप्रधानांनी संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि म्यानमार आणि थायलंडच्या सरकारांशी समन्वय राखण्याचे निर्देश दिले आहेत.

🔹 भारतीय दूतावासाची स्थिती:-बँकॉक आणि थायलंडच्या इतर भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. बँकॉकमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे. अद्याप कोणत्याही भारतीय नागरिकाच्या जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

🔹 आपत्कालीन संपर्क:-थायलंडमध्ये असलेले भारतीय नागरिक आपत्कालीन परिस्थितीत +66 618819218 वर संपर्क साधू शकतात. बँकॉकमधील भारतीय दूतावास आणि चियांग माईमधील वाणिज्य दूतावासातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत.

संबंधित पोस्ट

अ‍ॅक्सिओम फोर मोहिमेअंतर्गत शुभांशु शुक्लासह चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर सुखरूप परतले.

आसाममध्ये दरांग येथे सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या विकास कामांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पायाभरणी आणि उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

मकर संक्रांतीचे महत्त्व-   अध्यात्मिक वार्ता- 

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘महास्ट्राइड’ परिषदेत गडचिरोली जिल्ह्याचा विकास आराखडा सादर  जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे प्रभावी सादरीकरण..वर्ल्ड बँक व ‘मित्र’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आय.आय.एम. नागपूर येथे परिषद

नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावा ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश • जनसंवाद कार्यक्रमात 110 हून अधिक निवेदने प्राप्त • महसूलमंत्र्यांचा नागरिकांशी थेट संवाद

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा #पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे