vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेने उभारली ८०० कोटींच्या मालमात्ताकर वसुलीचे उद्दिष्ट गाठणारी गुढी ….

नवी मुंबई महानगरपालिकेने उभारली ८०० कोटींच्या मालमात्ताकर वसुलीचे उद्दिष्ट गाठणारी गुढी ….

 

        नवी मुंबई प्रतिनिधी  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बेलापूर येथील नवी मुंबई महानगरपालिकेत मालमत्ताकर विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी ८०० कोटींच्या कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याच्या संकल्पाची गुढी उभारली. २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या शेवटी २९, ३० व ३१ मार्च रोजी गुढीपाडवा व ईद अशा शासकीय सुट्ट्या आल्या होत्या, तथापि सदर दिवशी मालमत्ताकर विभागातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी जोमाने काम करून मालमत्ताकराच्या वसुलीसाठी प्राधान्य देऊन वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी मालमत्ताकर विभागातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत मालमत्ताकर भरावा यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने निरनिराळे उपक्रम राबविले . १० मार्च २०२५ पासून थकीत मालमत्ताकरावरील शास्ती रकमेवर ५० टक्क्यांची सूट देणारी ‘अभय’ योजना जाहीर केली. नागरिकांना ऑनलाईन मालमत्ताकर भरताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नवीन ऑनलाईन मालमत्ताकर संकलन प्रणाली सुरू केली.

  कर थकबाकी करणाऱ्या मालमत्ताधारकांना नोटिसा देणे, नळ कनेक्शन बंद करणे, कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांच्या घराबाहेर ढोलताशे वाजून त्यांना कर भरण्यासाठी जागे करणे, विविध समाज माध्यमांच्या उपयोगातून मालमत्ताकर भरण्यासाठी जागृती करणे, प्रसार माध्यमांतून करभरणा करण्याच्या जाहिराती करणे अशा प्रमुख उपक्रमांचा त्यात समावेश होता. नागरिकांसाठी सुट्ट्यांच्या दिवशी विशेष करभरणा केंद्रे (कॅश काऊंटर्स) सुरू ठेवण्यात आले. सुट्ट्यांच्या दिवशीही मालमत्ताकर विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी कर्तव्याला महत्त्व देत करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

   सन २०२५-२०२६ या पुढील आर्थिक वर्षात नवी मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता करवसुलीचे १२०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. नव्या आर्थिक वर्षात मालमत्ताकर संकलनाचे ठरवलेले लक्ष्य नवी मुंबई महानगरपालिका नियोजनबध्द पावले उचलत नक्कीच गाठेल असा विश्वासही डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

000000

संबंधित पोस्ट

बारामती तालुक्यात अतिवृष्टीमुळे काटेवाडी परिसरातून ७ आणि शहरातून १ अशा ८ नागरिकांची सुखरूप सुटका. नीरा डावा कालवा फुटल्यामुळे बाधित भागातील कुटुंबांचे सुरक्षित स्थलांतर. 

पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागातील-सहायक आयुक्त पदाच्या 311 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू· पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे ठोस निर्णय..

vishwatmaklokswamivarta

सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. मैनाक घोष रुजू-मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची पदोन्नतीने बदली

vishwatmaklokswamivarta

धारावी विभागात रस्ते कॉन्ट्रॅक्टरचा कारनामा -दहा दिवसात दोन वेळा डांबरी ठिगळ लावून धारावीतील किरकोळ रस्ता दुरुस्ती..

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा*

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)ई-क्युजे ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण,सहकार विभागाची अर्धन्यायिक निर्णय प्रक्रिया आता आणखी जलद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस