vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कोकण विभागाची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत उल्लेखनीय कामगिरी

कोकण विभागाची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत उल्लेखनीय कामगिरी

 

ठाणे, प्रतिनिधी आर्थिक वर्ष 2024-25 साठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत कोकण विभागातील पाच जिल्ह्यांसाठी डीआयसी एजन्सी – 2 हजार 802 (101.52%) आणि (डीआयसी+केव्हीआयबी)- 3 हजार 273 चे 100% एकूण लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. यामध्ये रत्नागिरी (151.46%), रायगड (104.5%), सिंधुदुर्ग (125.83%), पालघर (101%) या चार जिल्ह्यांसाठी 100% पेक्षा जास्त लक्ष्य साध्य केले आहे. इतर जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त कामगिरीद्वारे ठाणे (54.03%) क्षेत्राची तूट भरून काढली आहे.

 कोकण विभाग (डीआयसी), रत्नागिरी (जिल्हा), सिंधुदुर्ग (डीआयसी), पालघर (डीआयसी) ने सलग दोन वर्षे 100% लक्ष्य साध्य केले असून रायगड जिल्ह्याने पहिल्यांदाच 100% डीआयसी लक्ष्य साध्य करून इतिहास रचला आहे. तसेच, रत्नागिरीने महाराष्ट्रात सर्वाधिक एमएम दावे (83%) सादर केले आहेत आणि महाराष्ट्रात एमएम वितरणात दुसऱ्या क्रमांकावर आहे

  या कामगिरीकरिता कोकण विभाग उद्योग सहसंचालक कार्यालय, सर्व महाव्यवस्थापक, सर्व उद्योग अधिकारी/उद्योग निरीक्षक, सर्व एलडीएम आणि सर्व बँक अधिकारी, सर्व 5 जिल्ह्यांचे एमसीईडी/मिटकॉन अधिकारी आणि त्यांच्या टीमचे 100% पेक्षा जास्त लक्ष्य साध्य केल्याबद्दल तसेच, 54% लक्ष्य साध्य केल्याबद्दल ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती सोनाली देवरे, व्यवस्थापक, उद्योग निरीक्षक आणि त्यांच्या टीमचे कोकण विभागाच्या उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ यांनी अभिनंदन केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

अवैध सावकारीबाबत तक्रारी दाखल करण्याचे आवाहन

टपाल विभागात ‘डाक जीवन विमा’ प्रतिनिधींची भरती; 20 जानेवारीला मुलाखती

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मार्च महिन्यातील सेवानिवृत्तांचा सन्मान

नांदेड शहरात 15 व 16 जानेवारीला भरणारे आठवडी बाजार राहणार बंद

केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्राचे ‘स्टेट मन्युफॅक्चरिंग मिशन’ सुरू करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’चे पुणे येथे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्याला पर्यटन हब करणार – पालकमंत्री शंभूराज देसाई महाराष्ट्र राज्य स्‍थापना दिनानिमित्त ध्वजवंदन