vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सामाजिक समता सप्ताहाच्या” निमित्ताने कोकण विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन  –प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी….

सामाजिक समता सप्ताहाच्या” निमित्ताने कोकण विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन  –प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी….

 

नवी मुंबई प्रतिनिधी : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यभरात भारतरत्न “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली असून पुढील 6 दिवस कोकण विभागात विविध कार्यक्रमांद्वारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. अशी माहिती सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, मुंबई विभाग बाळासाहेब सोळंकी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील सर्व जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दि. 08 ते दि. 14 एप्रिल, 2025 या कालावधीत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” राबविण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. यानुसार, कोकण विभागातही विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यात आली. यावेळी कोकण विभागात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा कोकण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी सांगितली.

असे असतील सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम…सामाजिक न्याय विभागाने शासन परिपत्रकान्वये दिलेल्या सुचनेनुसार, कोकण विभागात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दि.08 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह या कार्याक्रमाचे उद्घाटन.

दि. 09 एप्रिल रोजी कोकण विभागातील सर्व शाळा महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे येथे बाबासोब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धांचे आयोजन करणे. तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभांचे प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

दि. 10 एप्रिल रोजी, समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्य आदी माध्यमांतून सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहिती बाबत प्रबोधन करण्यात येईल. तसेच प्रत्येक जिल्हयात मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल.

एप्रिल रोजी, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करून विविध वक्त्यांना निमंत्रित करून महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे

दि. 12 एप्रिल रोजी संविधान जागर या विशेष कार्यक्रमांतर्गत भारतीय संविधानाविषयी सर्वसाधरण माहिती देणे तसेच संविधानाची निर्मिती, संविधान समिती, मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये याविषयी माहिती देणाऱ्या व्याख्यानांचे आयोजन करणे.

दि. 13 एप्रिल रोजी, ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. विभागातील महत्त्वाच्या ठिकाणी व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.· चर्चासस्त्रे,लघुनाटय,शिबीरांचे आयोजन· लाभार्थ्यांना होणार लाभाचे वाटप· संविधाना होणार प्रसार वस्तामधून केली जाणार स्वच्छता· जात पडताळणी प्रमाणपत्रे मिळणार ऑनलाईनदि. 14 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या कोकण विभागातील सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे इत्यादी सर्व आस्थपनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून त्याठिकाणी, व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. याच दिवशी सर्व कोकण विभागातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमार्फत ऑनलाइन जात पडताळणी प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत.

कोकण विभागामध्ये आयोजित या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, मुंबई विभाग बाळासाहेब सोळंकी यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेस आणि कार्यक्रमास मोठी उपस्थिाती होती.

000000000000000

संबंधित पोस्ट

एनसीबीनं केलेल्या  कारवाईत,जामीन मिळूनही आर्यन जेलमध्येच, असा रंगला आजचा ड्रामा

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली येथे आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांच्या सोबत साजरी केली दिवाळी.

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी पुढाकार घ्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

बीडीडी चाळ ‘अत्यावश्यक प्रकल्प’ म्हणून घोषित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

मुंबई-पुणे दरम्यान धावणारी प्रगती एक्सप्रेस 25 जुलैपासून विस्टाडोम कोच सह; आजपासून बुकिंग सुरू

सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा