vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचा येत्या दि.28 एप्रिल रोजी मुंबईत महामोर्चा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचा येत्या दि.28 एप्रिल रोजी मुंबईत महामोर्चा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

 

मुंबई प्रतिनिधी ~ बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ही देशभरातील बौद्धांची न्याय्य मागणी आहे.त्यासाठी बिहार सरकार ने महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 हा कायदा रद्द करावा आणि महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्ट मध्ये सर्वच्या सर्व प्रतिनिधी बौद्ध असावेत या मागणी साठी येत्या दि.28 एप्रिल रोजी रिपब्लिकन पक्षाचा मुंबईत भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चात मुंबई आणि ठाण्यातील सर्व आंबेडकरी बौद्ध जनतेने मोठ्या संख्येने सामील होऊन बौद्धांची ताकद दाखवावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे.

भीमछाया सांस्कृतिक केंद्र येथे रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश च्या आयोजित बैठकीत ना.रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी विचारमंचावर रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे; महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; प्रकाश मोरे; एम एस नंदा; विवेक पवार; महिला आणि युवक आघाडी चे प्रमुख पदाधिकारी आणि मुंबईतील सर्व जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते.

0000000

संबंधित पोस्ट

सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मृति अभिवादन कार्यक्रमाचे आयोजनडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नात रमा तेलतुंबडे-आंबेडकर यांची विशेष उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेल पुरवठ्याचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

पाटण शहरातील रस्त्याचे काम दोन महिन्यात पूर्ण करा; पालकमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील चार शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज साधणार शेतकरी, कामगारांशी संवाद*     

बारावी जीवशास्त्रची परीक्षा जिल्ह्यातील 109 परीक्षा केंद्रावर सुरळीत : जिल्हाधिकारी राहूल कर्डिले· कंधार तालुक्यात पानभोसी केंद्रावर पेपर संपेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती· जिल्ह्यात 98.24 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती  जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या भरारी पथकामार्फत निगरानी…