vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर

उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर

 

प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे): ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत सन २०२२-२३ या वर्षासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येतो. यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश अंकुश फडतरे यांची निवड राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. या यशाबद्दल जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त कैलास शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

फडतरे यांनी जिल्हा परिषद सातारा येथे काम करत असताना कोविड काळात उत्कृष्ट कामकाज केले आहे. ग्रामपंचायत भवन बांधकाम, पाणी पुरवठा योजना, उपजीविका अभियान, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, पथदिवे योजना, विविध इमारत बांधकाम योजना, रोजगार हमी योजना, तसेच पंचायत राज यंत्रणेच्या डिजिटलायझेशन अशा अनेक विभागांमध्ये प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्यांच्या पारदर्शक प्रशासकीय प्रक्रियेतील योगदान, व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य यामुळे त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.

    या पुरस्कारामार्फत त्यांचे सकारात्मक प्रशासन, योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि लोकाभिमुख कामगिरी यांची शासन स्तरावरून दखल घेण्यात आली आहे. हा सन्मान त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रामाणिकता, काटेकोर नियोजन आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक मानला जातो.

     हा गौरव कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असून, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. अविनाश फडतरे यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेतील सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि सर्वच स्तरातून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.

000000000–

संबंधित पोस्ट

वैजापूर येथील स्ट्राँगरूमची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

आस्थापनांनी खासगी सुरक्षा रक्षकांना द्यावयाच्या लाभाबाबत तपासणी मोहीम राबविणार – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर विधानसभा प्रश्नोत्तर

पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आभा कार्ड व आयुष्यमान कार्ड योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणीसाठी विशेष मेळाव्यांचे आयोजन

सुरक्षित शहरांसाठी सीसीटीव्हीचे प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करण्यात यावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • सीसीटीव्ही यंत्रणेच्या सनियंत्रणासाठी महामंडळाची निर्मिती करा• माहिती व तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक

वेरूळ- घृष्णेश्वर विकास आराखड्याची कामे विहित मुदतीत पूर्ण करा- अपर मुख्य सचिव बी. वेणू गोपाल रेड्डी

हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त भव्य नगर कीर्तन-सीबीडी बेलापूर ते ओवे मैदानापर्यंतचा परिसर भक्तीमय वातावरणात निघाला न्हावून,बोले सो निहाल’च्या जयघोषाने दुमदुमले खारघर…