vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरआज विराट जनआक्रोश मोर्चा जिल्हाभरातील भुमिहिन, बेघर, कास्तकर सहभागी होणार..

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरआज विराट जनआक्रोश मोर्चा जिल्हाभरातील भुमिहिन, बेघर, कास्तकर सहभागी होणार..

जालना प्रतिनिधी आज: सोमवार २१ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता शिवसेना दलित आघाडीच्यावतीने भुमिहिन बेघर, जिल्हा स्तरावर सौरऊर्जेचा प्रकल्प दलित आदिवासी कास्त पट्टे न्याय प्रविष्ट असताना बळजबरी ताब्यात घेत असल्याचेप्रशासनाच्या विरोधात तसेच जेनपुर (कोठारा) येथील जालना वरिष्ठन्यायालयात न्यायप्रविष्ट असताना भोकरदन पोलिस ठाण्यामार्फत ताबा करुन भुमिहिनांचा घरे पाडून निर्वासित केले आहे. त्या विरोधात शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अति विराट जनआक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.दलित आदिवासी भूमिहीन बेघर निराधार यांच्या न्याय हक्कासाठी व तसेच जिल्हा स्तरावर सौऊर्जेचा प्रकल्प दलित आदिवासी कास्त पट्टे न्याय प्रविष्ट असताना बळजबरी ताब्यात घेत असल्याचे प्रशासनाचे विरोधात तसेचजेनपुर (कोठारा) येथील जालना वरिष्ठ न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना भोकरदन पोलिस ठाण्यामार्फत ताबा करून स्थानिक दलित आदिवासी भूमिहीन कास्तकरांचे कोंबड्या, बकर्‍या, घरे पाडून निर्वासित केले आहे. त्या विरोधात शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड.भास्करराव मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विराट जनआक्रोश मोर्चा जालना जिल्हाधिरी कार्यालयावर २१ एप्रिल सोमवारी ११.३० वाजता अंबड चौफुलीपासून सुरुवात होणार असून तेजिल्हाधिकारी कार्याल्यावर धडकणार आहे. या अति विराट मोर्चात सहभागीव्हावे, असे आवाहन संयोजक आणासाहेब बाळराज, जय खरात, प्रल्हाद साळवे,संदिप काकडे, बाबासाहेब बोबडे, विलास खरात यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

कण्हेर धरण*धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजक श्लोका अंबानी यांच्या पुढाकाराने गडचिरोलीत ‘सोलर शाळा’ उपक्रम

vishwatmaklokswamivarta

राज्यात १६ ठिकाणी ‘मॉक सिक्युरिटी ड्रिल’चे आयोजन

विमानतळ भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती; शेतकऱ्यांना लेखी आश्वासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय..-सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची आंदोलनस्थळी भेट; जनभावनांचा आदर राखत शासनाची सकारात्मक भूमिका

आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित भारतच्या उभारणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे; शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे– महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर*