पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले पुणे जिल्ह्यातील दोन सुपुत्र – कौस्तुभ गानबोटे व संतोष जगदाळे या पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पुणे प्रतिनिधी -पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले पुणे जिल्ह्यातील दोन सुपुत्र – कौस्तुभ गानबोटे व संतोष जगदाळे या पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आज त्यांचे पार्थिव पुणे विमानतळावर आणण्यात आले, यावेळी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या अमानुष घटनेने संपूर्ण जिल्हा आणि राज्य शोकाकुल झाला आहे.कौस्तुभ व संतोष यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.