vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

जातिनिहाय जनगणना हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा क्रांतिकारक निर्णय ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*जातिनिहाय जनगणना हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा क्रांतिकारक निर्णय ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

 

मुंबई प्रतिनिधी ~ जातनिहाय जनगणना करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा क्रांतिकारक निर्णय आहे. जातनिहाय जनगणने च्या निर्णयाचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही स्वागत करतो. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात हा निर्णय घेण्याची हिंमत दाखवली नाही आता राहुल गांधींनी यावर टीका करू नये. सर्व जातींना न्याय देण्यासाठी ही जातनिहाय जनगणना उपयोगी ठरेल. या क्रांतिकारक निर्णय बद्दल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करीत आहोत अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी जातनिहाय जनगणने च्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

भारतीय संविधानाच्या कलम 17 नुसार जातीभेद करणाऱ्या जाती संपवण्यात आल्या आहेत.मात्र तरीही समाजात जाती आहेत.प्रत्येक जातीची लोकसंख्या या जातिनिहाय जनगणने नुसार स्पष्ट होईल.कोणत्या जात घटकाला कोणत्या क्षेत्रात मागास आहेत.त्यांना कसली कमतरता आहे.त्याची पूर्तता करण्यास या जात

जनगणनेचा फायदा होईल.प्रत्येकाला न्याय देण्यासाठी देशात समाजात प्रत्येक जातीची सद्यस्थिती सत्य चित्र स्पष्ट होणे आवश्यक आहे.त्यासाठी ही जात जनगणना उपयोगी ठरेल.सामाजिक समता आणि सर्वांचा सर्वंकष विकास करण्यासाठी जात जनगणना महत्वाची ठरेल. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जातनिहाय जनगणनाचा निर्णय हा त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.असे सांगत ना. रामदास आठवले यांनी जातनिहाय जनगणना च्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५मुख्य निवडणूक निरीक्षक जगदीश मिनीयार यांनी घेतला महानगरपालिका निवडणुकीचा आढावा -जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त आशिमा मित्तल यांनी दिली आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी संदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती • आचारसंहिता, स्ट्राँग रूम आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत नोडल अधिकाऱ्यांशी साधला संवादमतदान प्रक्रिया निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी संवेदनशील मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवा- मुख्य निवडणूक निरीक्षक जगदीश मिनीयार 

सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश* दहावी, बारावी परीक्षेच्या तयारीचा घेतला आढावा* बुलढाण्यात बारावीच्या ३४,६३५ विद्यार्थ्यांची परीक्षा ; ११६ परीक्षा केंद्र…

vishwatmaklokswamivarta

नेताजी’ सुभाषचंद्र बोस. २३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिन आपण ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा

vishwatmaklokswamivarta

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे ‘स्टॉकहोम कॉन्फरन्स’मध्ये आज भाषण स्वीडनमधील भारतीय समुदायासोबत संस्मरणीय संवाद

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी….

जबड्यावर अवघड शस्त्रक्रिया झालेल्या मुलीकडून प्रशासनाप्रती कृतज्ञता- विभागीय आयुक्तांची भेट घेऊन व्यक्त केले ऋणनिर्देश

vishwatmaklokswamivarta