vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

जातिनिहाय जनगणना हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा क्रांतिकारक निर्णय ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*जातिनिहाय जनगणना हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा क्रांतिकारक निर्णय ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

 

मुंबई प्रतिनिधी ~ जातनिहाय जनगणना करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा क्रांतिकारक निर्णय आहे. जातनिहाय जनगणने च्या निर्णयाचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही स्वागत करतो. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात हा निर्णय घेण्याची हिंमत दाखवली नाही आता राहुल गांधींनी यावर टीका करू नये. सर्व जातींना न्याय देण्यासाठी ही जातनिहाय जनगणना उपयोगी ठरेल. या क्रांतिकारक निर्णय बद्दल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करीत आहोत अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी जातनिहाय जनगणने च्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

भारतीय संविधानाच्या कलम 17 नुसार जातीभेद करणाऱ्या जाती संपवण्यात आल्या आहेत.मात्र तरीही समाजात जाती आहेत.प्रत्येक जातीची लोकसंख्या या जातिनिहाय जनगणने नुसार स्पष्ट होईल.कोणत्या जात घटकाला कोणत्या क्षेत्रात मागास आहेत.त्यांना कसली कमतरता आहे.त्याची पूर्तता करण्यास या जात

जनगणनेचा फायदा होईल.प्रत्येकाला न्याय देण्यासाठी देशात समाजात प्रत्येक जातीची सद्यस्थिती सत्य चित्र स्पष्ट होणे आवश्यक आहे.त्यासाठी ही जात जनगणना उपयोगी ठरेल.सामाजिक समता आणि सर्वांचा सर्वंकष विकास करण्यासाठी जात जनगणना महत्वाची ठरेल. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जातनिहाय जनगणनाचा निर्णय हा त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.असे सांगत ना. रामदास आठवले यांनी जातनिहाय जनगणना च्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

शहरातील विकासकामे पूर्ण करताना उपयुक्ततेवर भर द्यावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअमरावती महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांबाबत आढावा..

vishwatmaklokswamivarta

अमृत आणि एम सी ई डी मार्फत मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गात साकारतेय भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प-निवृत्त EX INS Guldar ठरणार जागतिक दर्जाचे समुद्री पर्यटन आकर्षण-जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

रक्ताच्या नात्याने केले ‘निराधार’ पण तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाने दिला आपुलकीचा आधार.!

vishwatmaklokswamivarta

मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारी तपास,वैज्ञानिक पध्दतीने, सक्षमतेने होण्यासाठी मदत- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व दोन आयसर बसचे लोकार्पण

रस्त्यावरील खडयामुळे अपघाताने मृत्यु झाल्यास आता कुटुंबाला 6लाख रुपये मिळणार-प्रा.डॉ.जयपाल पाटील

vishwatmaklokswamivarta