शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी कृषी विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन
सातारा द प्रतिनिधी : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फळ पीकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
या योजनेतून आंबा, बाजू, चिकू, पेरु, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, सुपारी, केळी, ड्रॅगनफ्रूट, अॅव्हाकॅडो, द्राक्षे, करवंद इत्यादी फळपिकांची लागवड करता येते.