वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांचा जालना दौरा भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद बैठक
जालना (प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री. संजयजी सावकारे यांचा आज जालना जिल्हा दौरा झाला. या निमित्ताने त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात सकाळी १०.०० वाजता भाजपच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद बैठक घेतली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व जयंतीनिमित्त सुरु असलेल्या उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले.
या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांच्या अडचणी, स्थानिक पातळीवरील विकासकामे, तसेच जालना जिल्ह्यातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील संधी आणि आव्हानांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्री महोदयांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विकासाचा प्रत्येक भाग हा कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागातूनच शक्य आहे. सरकार आपल्या सोबत असून, जनतेच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
या प्रसंगी भाजप महानगर जिल्हाध्यक्षांनी बोलताना म्हणाले की, “अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रम पक्षाच्या वतीने सुरु आहेत, अहिल्याबाई होळकर यांनी जनतेच्या कल्याणासाठी केलेले कार्य, न्यायनिष्ठा आणि सत्तेचा लोकहितासाठी वापर, हे आजच्या काळातही प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यशैलीचा आदर्श घेऊनच आपण कार्यकर्त्यांनी समाजात आपले योगदान द्यावे. तसेच आपल्या पक्षाचे बळ हे कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर आणि लोकांच्या विश्वासावर उभे आहे. मत मांडा व पक्ष वाढवा ही आपली भूमिका असून, प्रत्येक कार्यकर्ता मतदारांपर्यंत पक्षाच्या धोरणांची माहिती पोहोचवण्यासाठी सदैव तत्पर राहिला पाहिजे.
जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. नारायण कुचे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पक्षवाढ ही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसून ती एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने गावपातळीवर पक्षाची सेवा करताना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. विकास आणि विश्वास हे आपल्या कार्याचे सूत्र असले पाहिजे.