vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बंदरे विभागाने लोकाभिमूख होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा- बंदरे मंत्री नितेश राणे

बंदरे विभागाने लोकाभिमूख होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा- बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, प्रतिनिधी : बंदरे विभागाने मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पहिल्या तीन विभागांमध्ये क्रमांक मिळवण्याच्या दृष्टीने काम करावे. तसेच अधिक लोकाभिमूख होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मंत्रालयात १५० दिवसांच्या अनुषंगाने बंदरे विभागाचा आढावा मंत्री श्री. राणे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी महामंडळाचे प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. राणे म्हणाले, १५० दिवसांच्या कार्यक्रमासाठी बंदरे विभागाने परिपूर्ण तयारी करावी. वेगवेगळ्या राज्यात बंदरे हाताळणीसाठी वापरण्यात येत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा विभागाने अभ्यास करावा. बोटींना ट्रॅक करण्यासाठी ॲप विकसित करावे. बंदरे विकास आणि बोटींच्या नियंत्रणासाठी विभागाची स्वतःची अधुनिक व्यवस्था विकसीत करावी. या सर्व गोष्टींसाठी अभ्यास दौऱ्यांचे नियोजन करावे. सविस्तर अभ्यास करून त्याचा आराखडा तयार करावा. प्रलंबित असलेली पदभरती तसेच रिक्त पदांवरील नियुक्त्या मार्गी लावाव्यात. ‘आय गॉट’ नोंदणी करावी, हरीत बंदर उभारणीवर भर द्यावा, अशा सूचनाही मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

संबंधित पोस्ट

मुंबई शिक्षक व पदवीधर,कोकण विभाग पदवीधर मतदार संघात,एकूण 3 लाख 59 हजार 737 मतदारांची नोंदणी

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत-मनुष्यबळ विकास कार्यक्रम संस्थानिहाय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम..

vishwatmaklokswamivarta

श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर’ माहितीपटाला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद – तब्बल ५.५३ लाख व्ह्युव मिळवलेले गडचिरोली जिल्ह्यातील पहिले माहितीपट

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार, पहिल्या टप्प्यामध्ये १० मॉल उभारणार पंचवीस लाख ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

श्रीगणरायाच्या आगमनापूर्वी खड्डे दुरुस्तीसह रस्ता सुधारणा कामाला वेग..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात अचानक कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असून ही चिंताजनक बाब . ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते, अशी शक्यता वर्तवली, त्यामुळे मुंबईकरांनी गंभीरपणे ही स्थिती हाताळावी, असे निर्देश पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत.

vishwatmaklokswamivarta