vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

येत्या तीन महिन्यात प्राण्यांची गणना करणार-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

येत्या तीन महिन्यात प्राण्यांची गणना करणार-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

 

     अमरावती, प्रतिनिधी : जिल्ह्यातील पशूधनाची अचूक माहिती व्हावी, यासाठी येत्या तीन महिन्यात प्राण्यांची गणना करण्यात येणार आहे. तसेच प्राण्यांचे टॅगींग करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राणीक्लेश समितीची सभा पार पडली. यावेळी जिल्हा अधिक्षक पोलिस अधिकारी विशाल आनंद, पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्यासह समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्ह्यातील पशू गणनेची माहिती घेतली. पशूधन वाढविण्यासाठी सर्वकष प्रयत्न करण्यात यावे. तसेच येत्या पावसाळ्याच्या कालावधीत जनावरांना आजाराची लागण होऊ नये, यासाठी लसीकरण तसेच खबरदारी घेण्यात यावी. येत्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची तस्करी होऊ नये, यासाठी जिल्ह्यात आठ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहे. गोवंशाची वाहतूक होऊ नये, यासाठी परिवहन विभागानेही दक्ष राहावे. तस गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. पोलिस विभागातर्फे योग्य कार्यवाही करण्यात येईल.

बकरी ईदला गोवंशाचा बळी टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. बकरी ईदला प्राण्यांचा बळी देण्यात येतात. मात्र यावर्षी बकरी ईदला गोवंशाचा बळी देण्याचे टाळावे. गोवंशाचा बळी देणे कायद्याने गुन्हा असून असे प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल. गोवंशाचा बळी देऊ नये, यासाठी जनजागृती करावी, तसेच कायद्याची माहिती नागरिकांना द्यावी. येत्या काळात जनावरांची खरेदी विक्री होत असलेल्या ठिकाणी लक्ष ठेऊन ही विक्री नियमाप्रमाणेच होण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.

 

000000

संबंधित पोस्ट

शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न परिपाठ ते गृहपाठ पर्यंत विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाची संधी द्या. – जिल्हाधिकारी- डॉ. किरण पाटील 

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा — रोहयो मंत्री भरत गोगावले #शिवराज्याभिषेक रायगड जिमाका दि. १६– रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तिथी व तारखेनुसार अनुक्रमे ६ व ९ जून रोजी आयोजन करण्यात आले आहॆ. या कार्यक्रमाच्या नियोजनाची रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षते खाली सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी सर्व यंत्रणेला दिल्या. महाड शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अप्पर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके यांसह विविध विभागाचे अधिकारी व कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या अस्मितेचा विषय आहॆ. गेली ३५ वर्ष हा उत्सव सुरु आहॆ. या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहॆ. त्यामुळे हा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पडण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. तेव्हा प्रत्येकाने आपले काम चोखपणे करावे. शिवभक्तांना सर्व सोयी सवलती विहित मुदतीत उपलब्ध करून द्याव्यात त्यामध्ये कुठलेही हयगय करू नये असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यंदा मान्सून लवकर सुरु झाला आहॆ. त्यामुळे पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडप, भोजन, विद्युत आणि आरोग्य व्यवस्था तैनात ठेवाव्यात. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वैद्यकीय पथक सुसज्ज ठेवावे, गडावर पुरेश्या प्रमाणात वैद्यकीय पथक, स्ट्रेचर, औषधसाठा ठेवावा. विशेषता सर्पदंश होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याप्रमाणे औषधे उपलब्ध ठेवावीत. जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम नियोजनासाठी गठीत केलेल्या समित्यानी आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असेही श्री गोगावले यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले की,शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या समित्याची नेमणूक केली आहे. मुख्यत्वे आरोग्य,पाणी पुरवठा,मंडप,खानपान, राजशिष्टाचार,परिवहन, विद्युत, पाणी आणि शौचालय आदी सर्व समित्यांची नेमणूक केली आहॆ. सर्व नियोजन सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीत सर्व समित्यानी केलेल्या कामाचा आढावा सादर केला. तसेच कोकण कडा मित्र मंडळाने देखील आवश्यक बाबीबाबत सूचना केल्या.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘भारत पर्व २०२५’ राष्ट्रीय एकात्मता वाढवून विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारा सोहळा

vishwatmaklokswamivarta

विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

घणसोलीत सार्वजनिक ठिकाणी डेब्रिज टाकणारी दोन वाहने जप्त करीत 60 हजार रककमेची दंडात्मक कारवाई 

vishwatmaklokswamivarta

स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी सुविधा-कौशल्य विकास केंद्रातर्फे विनामूल्य अभ्यासिका

vishwatmaklokswamivarta