vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत”जमीन विक्रीसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

“भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत”जमीन विक्रीसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

लातूर( प्रतिनिधी दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन आदिवासी कुटुंबांना शेत जमीन मिळण्यासाठी “भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजना” राबविण्यात येते. या योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यातील (प्राधान्याने किनवट व माहूर तालुका) येथील शेती मालकांनी आदिवासी विभागाच्या 28 जुलै, 2021 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जमीन विकण्यासाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, ता.किनवट, जि. नांदेड येथील सुविधा केंद्रामध्ये 10 जुलै, 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत परिपूर्ण अर्जाचा भरणा करावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02469-222015 किंवा poitdp.kinwat-mh@gov.in या ई-मेल आयडीवर संपर्क करण्याचे आवाहन नांदेड येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जेनित चद्रा दोन्तुला यांनी केले आहे.

भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत 04 एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा 02 एकर बागायती (ओलीताखालील) जमीन शासनामार्फत शेती मालकांकडून खरेदी करून पात्र भूमिहीन आदिवासी कुटुंबाला उपलब्ध करून दिली जाते, असेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

संबंधित पोस्ट

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी-नाशिक येथे 10 दिवसांचे मोफत पूर्व प्रशिक्षण

जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी हल्ला प्रतिकार प्रात्यक्षिक सराव..

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी…

कर्करोग निदान मोबाइल व्हॅनद्वारे ठाणे जिल्ह्यात तपासणी आणि जनजागृती मोहिमेचा प्रारंभ  

vishwatmaklokswamivarta

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध विभागांना सतर्कतेच्या सूचना…

नवउद्योजकांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा – बाळासाहेब सोळंकी ,प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, मुंबई

vishwatmaklokswamivarta