vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवउद्योजकांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा – बाळासाहेब सोळंकी ,प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, मुंबई

नवउद्योजकांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा – बाळासाहेब सोळंकी ,प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, मुंबई

 

( सुरेश गायकवाड ) नवी मुंबई- मागासवर्गीय समाजातील युवकांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे उद्योजक बनावे यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन बाळासाहेब सोळंकी, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई विभाग यांनी केले आहे.

 खारघर येथील सत्याग्रह विधी कॉलेज येथे   मी उद्योजक होणार या एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.सामाजिक न्याय विभाग, एस एस सी व्हिजन फाउंडेशन, सम्राट अशोका चेंबर्स ऑफ एग्रीकल्चर अँड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मागासवर्गीय समुदायातील नव उद्योजक यांच्या आर्थिक उन्नतीसाठी व शासकीय योजनेच्या जनजागृतीसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.

 मागासवर्गीय समाजातील युवकांना उद्योजक बनण्यासाठी केंद्र सरकारच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात योजना कार्यरत आहेत त्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे प्रफुल उंबरे यांनी दिली. राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती केंद्राचे प्रभारी महेंद्र मालवीया यांनी उद्योग बनण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणींवर सविस्तर मार्गदर्शन केले. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या वतीने सुमारे 20 लाखापर्यंत नव उद्योजकांसाठी कर्ज देण्याची योजना सुरू असल्याचे यावेळी सांगितले. व महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असेही आवाहन महामंडळाचे महाव्यवस्थापक राकेश बेद यांनी केले. या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात जिल्हा अग्रणी बँकेचे अभिषेक पवार, आयडीबीआय बँकेचे विक्रम जैन यांनी नव उद्योजकांसाठी विविध बँकांच्या योजनांची माहिती दिली. कार्यशाळेच्या तिसऱ्या क्षेत्रात सत्रात सामाजिक न्याय विभागाच्या मार्जिन मनी या योजने संदर्भात सादरीकरण करण्यात आले.

  यावेळी या योजनेचा लाभ घेतलेले कुणाल वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सामाजिक न्याय विभागाच्य या योजनेमुळे आपली आर्थिक उन्नती होण्यास मदत झाली असे सांगितले. कार्यशाळेचा शेवटच्या सत्रात उद्योजक देवानंद लोंढे, हॉटेल मालवणी तडकाचे आदर्श शेट्टी, यांनी आपले उद्योग जगातील आपले अनुभव सांगितले.आयात व निर्यात क्षेत्रातील अभय थंड गाणी यांनी आयात निर्यातीबाबत मार्गदर्शन केले.

   या कार्यशाळेस, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मोरे, समाधान इंगळे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड, जनसंपर्क अधिकारी संजय भोसले, जी के डोंगरगावकर, विश्वस्त राहुल शिक्षण प्रसारक मंडळ वाईल्ड विजन फाउंडेशनच्या शितल बोराडे, निलांबरी कांबळे आदीमान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटना देशव्यापी आंदोलन छेडणार..

मराठी विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळा-मराठीभाषेत ज्ञानसाधनांची निर्मिती आवश्यक-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

अभिजात मराठी भाषा सप्ताहात नवी मुंबई महानगरपालिका कर्मचा-यांनी घेतले शुध्दलेखनाचे धडे

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात 417 नामनिर्देशन अर्ज वैध तर 78 अर्ज अवैध..

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी डिएपी खतास पर्यायी खते वापरण्याचे कृषी विभागाचे आवाहन

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे“आदर्श जिल्हा” आणि “उत्तम कार्यकर्ता” पुरस्कार जाहीरठाणे जिल्हा समन्वय समितीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

vishwatmaklokswamivarta