vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवउद्योजकांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा – बाळासाहेब सोळंकी ,प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, मुंबई

नवउद्योजकांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा – बाळासाहेब सोळंकी ,प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, मुंबई

 

( सुरेश गायकवाड ) नवी मुंबई- मागासवर्गीय समाजातील युवकांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे उद्योजक बनावे यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन बाळासाहेब सोळंकी, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई विभाग यांनी केले आहे.

 खारघर येथील सत्याग्रह विधी कॉलेज येथे   मी उद्योजक होणार या एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.सामाजिक न्याय विभाग, एस एस सी व्हिजन फाउंडेशन, सम्राट अशोका चेंबर्स ऑफ एग्रीकल्चर अँड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मागासवर्गीय समुदायातील नव उद्योजक यांच्या आर्थिक उन्नतीसाठी व शासकीय योजनेच्या जनजागृतीसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.

 मागासवर्गीय समाजातील युवकांना उद्योजक बनण्यासाठी केंद्र सरकारच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात योजना कार्यरत आहेत त्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे प्रफुल उंबरे यांनी दिली. राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती केंद्राचे प्रभारी महेंद्र मालवीया यांनी उद्योग बनण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणींवर सविस्तर मार्गदर्शन केले. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या वतीने सुमारे 20 लाखापर्यंत नव उद्योजकांसाठी कर्ज देण्याची योजना सुरू असल्याचे यावेळी सांगितले. व महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असेही आवाहन महामंडळाचे महाव्यवस्थापक राकेश बेद यांनी केले. या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात जिल्हा अग्रणी बँकेचे अभिषेक पवार, आयडीबीआय बँकेचे विक्रम जैन यांनी नव उद्योजकांसाठी विविध बँकांच्या योजनांची माहिती दिली. कार्यशाळेच्या तिसऱ्या क्षेत्रात सत्रात सामाजिक न्याय विभागाच्या मार्जिन मनी या योजने संदर्भात सादरीकरण करण्यात आले.

  यावेळी या योजनेचा लाभ घेतलेले कुणाल वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सामाजिक न्याय विभागाच्य या योजनेमुळे आपली आर्थिक उन्नती होण्यास मदत झाली असे सांगितले. कार्यशाळेचा शेवटच्या सत्रात उद्योजक देवानंद लोंढे, हॉटेल मालवणी तडकाचे आदर्श शेट्टी, यांनी आपले उद्योग जगातील आपले अनुभव सांगितले.आयात व निर्यात क्षेत्रातील अभय थंड गाणी यांनी आयात निर्यातीबाबत मार्गदर्शन केले.

   या कार्यशाळेस, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मोरे, समाधान इंगळे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड, जनसंपर्क अधिकारी संजय भोसले, जी के डोंगरगावकर, विश्वस्त राहुल शिक्षण प्रसारक मंडळ वाईल्ड विजन फाउंडेशनच्या शितल बोराडे, निलांबरी कांबळे आदीमान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

बाल हक्क संरक्षणासाठी ‘बालरक्षा अभियान’राबवणार – अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह मुख्यमंत्री यांच्या हस्ते बालस्नेही पुरस्कार – २०२४ चे वितरण

vishwatmaklokswamivarta

धारावीकरांसाठी खुशखबर- सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा #पुनर्विकास करण्यात यावा.- प्रकल्प राबविताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्ये यांना केंद्रस्थानी ठेवण्यात यावे. ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोंदिया जिल्ह्यातील कृषी विकासाच्या सर्व प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना,इच्छुकांनी योजनेच्या अधिक माहितीकरीता संपर्क साधावा

अंबरनाथकरांना शाश्वत व स्वच्छ पाणी देण्यासाठी नियोजन करावे- पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

नव्या मुंबईत विठुमाऊलीच्या नामगजरासह स्वच्छता दिंडी सोहळ्यात स्वच्छता व पावसाळी पाण्याच्या संग्रहण संदेशाचा जागर…