दहिपुरी मध्ये आज सत्यभामा सिताराम हनवते परिवाराकडून गरजूंना पंधरा किटचे वाटप.
दहिपुरी / प्रतिनिधी – अंबड तालुक्यातील दहीपुरी येथील सत्यभामा सितारामहनवते यांच्याकडून गोरगरीब तसेच गरजूंना त्यांनी आज पंधरा किटचे वाटपकेले आहे. यामध्ये गहू ,तांदूळ ,साखर, तेल ,चहापत्ती, रवा, डाळ,शेंगदाणे, गुळ, अशा विविध 15 वस्तू या किटमध्ये समाविष्ट करण्यात आल्याआहेत. या अगोदर सुद्धा त्यांनी कोरोना काळामध्ये गोरगरीब जनतेला धान्यतसेच किट वाटप केलेले आहे.
यावेळी उपस्थित पोलीस पाटील गौतम लिहिणार, श्री एस एस कंपनी मुंबईचे उद्योजक बाबासाहेब सीताराम हनवते, ठकाराम सीताराम हनवते, मनोज वाघमारे,महेश अबोकर, गणेश राक्षे, अवधूत दांडेकर, निखील हनवते तसेच संपादकदै./सा. जालना कालनिर्णयचे प्रताप गायकवाड, संपादक साप्ताहिक भारतीय एकताअखंडता चे राहुल गायकवाड, पुण्यनगरीचे ग्रामीण प्रतिनिधी गायके हे देखीलयावेळी उपस्थित होते. याबद्दल गरजूंनी हनवते परिवाराचे आभार मानले आहे