vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालन्यात प्रथमच बुद्धिबळ स्पर्धेचे रंगतदार आयोजन!जालना गणेश फेस्टिव्हल तर्फे खुली, 15 व 10 वर्षाखालील गटांत स्पर्धा – विजेत्यांना रोख पारितोषिके व ट्रॉफी

जालन्यात प्रथमच बुद्धिबळ स्पर्धेचे रंगतदार आयोजन!जालना गणेश फेस्टिव्हल तर्फे खुली, 15 व 10 वर्षाखालील गटांत स्पर्धा – विजेत्यांना रोख पारितोषिके व ट्रॉफी

 

जालना (प्रतिनिधी) :

जालना शहरात रविवार दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी बुद्धिबळ प्रेमींसाठी मोठा सोहळा रंगणार आहे. जालना गणेश फेस्टिव्हलच्या वतीने कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल, जुना जालना येथे खुली गट तसेच 15 वर्षाखालील व 10 वर्षाखालील गटांत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना आकर्षक रोख पारितोषिके व ट्रॉफी देण्यात येणार असून, सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

स्पर्धेतील पारितोषिके खुला गट : प्रथम – ₹2101, द्वितीय – ₹1501, तृतीय – ₹1001, 15 वर्षाखालील गट : प्रथम – ₹1501, द्वितीय – ₹1001, तृतीय – ₹701, 10 वर्षाखालील गट : प्रथम – ₹1001, द्वितीय – ₹701, तृतीय – ₹501

स्पर्धेसाठी आवश्यक अटी : स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंनी स्वतःचा बुद्धिबळपट सोबत आणणे बंधनकारक आहे. तसेच 15 व 10 वर्षाखालील गटातील खेळाडूंनी आपला नगर परिषदेचा जन्म दाखला सोबत ठेवणे आवश्यक आहे.

* संयोजन समितीचे आवाहन *

या बुद्धिबळ महोत्सवात जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जालना गणेश फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, अध्यक्ष अशोकराव आगलावे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब घुगे तसेच मुख्य पंच श्री. सतीश ठाकूर व पंच श्री. कृष्णा ठाकूर यांनी केले आहे.

नावनोंदणीसाठी सतीश ठाकूर 9960640602 / 7620857664 या नंबर वर संपर्क करून नोंदणी करावी. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील लहानग्या खेळाडूंना आपले बुद्धिबळ कौशल्य सादर करण्याची मोठी संधी मिळणार आहे.

संबंधित पोस्ट

पाणी पुरवठा योजनांची अपूर्ण कामे वेगात पूर्ण होण्यासाठी विभागीय आयुक्तांना अतिरिक्त अधिकार – मंत्री गुलाबराव पाटील

यंत्रमाग उद्योगांना वीज सवलत योजनेच्या लाभासाठीवस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर नोंदणी अनिवार्य..

आंतरजातीय विवाह केलेल्या १४० जोडप्यांना अनुदान वितरीत

बुलढाणा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वअभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा’

vishwatmaklokswamivarta

वरसोली येथे पाठांतर स्पर्धा संपन्न

राज्य व जिल्हा यंत्रणांनी संपर्कात राहून समन्वयानं नागरिकांच्या बचाव व मदतकार्याला प्राधान्य द्यावं -मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची प्रशासनाला सूचना शेती, पिके, पशुधन, घरांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश