vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी पंचशिल धम्म ध्वज यात्रा आज जालन्यात नागपूर ते चैत्यभुमी दरम्यान पू.भन्ते विनाचार्य साधणार जनसंवाद

महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी पंचशिल धम्म ध्वज यात्रा आज जालन्यात नागपूर ते चैत्यभुमी दरम्यान पू.भन्ते विनाचार्य साधणार जनसंवाद

राज्य प्रतिनिधी

महाबोधी महाविहार मुक्त झाला पाहिजे यासाठी नागपूर ते चैत्यभमी पर्यंत भंते विनायचार्य यांची पंचशील धम्म ध्वज यात्रा ही दि. 16 ऑगस्ट 2025 पासून सुरु झाली असून ती आज शनिवार दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी जालना शहरात दाखल होणार आहे. नागपूर दीक्षाभूमी ते चैत्यभूमी मुंबई अशी ही यात्रा आहे

बिहार मधील महाबोधी महाविहार मुक्ती च्या समर्थनार्थ जनसंवाद पंचशिल धम्म ध्वज यात्रा सुरु करण्यात आली आहे. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या नागभूमी नागपूर येथे दिक्षा घेतली व तमाम नवकोटी जनतेला दिक्षा दिली. त्याच पावन दिक्षाभूमीतून 17 ऑगस्ट 2025 पासून ही यात्रा सुरु झाली आहे. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तसेच बीटी अ‍ॅक्ट 1949 रद्द करणे ही मागणी घेऊन ही धम्म ध्वज, जनसंवाद यात्रा भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. ही यात्रा आज शनिवार दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी जालना शहरात येत असून सकाळी 11 वाजता मंठा चौफुली येथून भिख्खु संघ, उपासक, उपासिका यांची पदयात्रा निघणार आहे. ही पदयात्रा मंठा चौफुली ते अंबड चौफुली पर्यंत निघणार असून गायत्री लॉन्स, अंबड चौफुली येथे या पदयात्रेचा समारोप होईल. त्यानंतर दुपारी 2 वाजता गायत्री लॉन्स येथे प्रसिद्ध प्रबोधनकार विकास राजा आणि सुभाष कोठारे यांचा बुध्द भिम गीतांचा कार्यक्रम होणार आहे

या कार्यक्रमात सर्व उपासक आणि उपासीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन बुध्दविहार समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत अमरावती विभागाने राज्यस्तरावर नावलौकिक मिळवावा – पालकमंत्री संजय राठोड पालकमंत्र्याच्या हस्ते विभागीय महसूल महोत्सवाचे उद्घाटन

गुरु तेग बहादूर यांच्या हौतात्म्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

समाजकारणाच्या मजबुतीसाठी राजकारण महत्त्वाचे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मित्र परिवारातर्फे भावपूर्ण सत्कार,वेगळ्या विदर्भाला पाठिंबा असल्याचे केंद्रीयराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे मत*  

अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी २.० अर्ज प्रक्रिया सुरूनवीन ‘महाआयडी’ अनिवार्य; अर्ज प्रलंबित न ठेवण्याच्या महाविद्यालयांना सूचना..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मनुष्यबळाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे राज्य निवडणूक आयोगाने केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

कायद्याची जाण निर्माण करण्यासाठी,सामाजिक न्यायासाठी महाशिबिर उपयुक्त ठरेल- न्यायमूर्ती भारती डांगरे ,इस्लामपूरमध्ये विधी साक्षरता, शासकीय योजनांचे महाशिबिर उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta