महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी पंचशिल धम्म ध्वज यात्रा आज जालन्यात नागपूर ते चैत्यभुमी दरम्यान पू.भन्ते विनाचार्य साधणार जनसंवाद
राज्य प्रतिनिधी
महाबोधी महाविहार मुक्त झाला पाहिजे यासाठी नागपूर ते चैत्यभमी पर्यंत भंते विनायचार्य यांची पंचशील धम्म ध्वज यात्रा ही दि. 16 ऑगस्ट 2025 पासून सुरु झाली असून ती आज शनिवार दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी जालना शहरात दाखल होणार आहे. नागपूर दीक्षाभूमी ते चैत्यभूमी मुंबई अशी ही यात्रा आहे
बिहार मधील महाबोधी महाविहार मुक्ती च्या समर्थनार्थ जनसंवाद पंचशिल धम्म ध्वज यात्रा सुरु करण्यात आली आहे. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या नागभूमी नागपूर येथे दिक्षा घेतली व तमाम नवकोटी जनतेला दिक्षा दिली. त्याच पावन दिक्षाभूमीतून 17 ऑगस्ट 2025 पासून ही यात्रा सुरु झाली आहे. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तसेच बीटी अॅक्ट 1949 रद्द करणे ही मागणी घेऊन ही धम्म ध्वज, जनसंवाद यात्रा भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. ही यात्रा आज शनिवार दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी जालना शहरात येत असून सकाळी 11 वाजता मंठा चौफुली येथून भिख्खु संघ, उपासक, उपासिका यांची पदयात्रा निघणार आहे. ही पदयात्रा मंठा चौफुली ते अंबड चौफुली पर्यंत निघणार असून गायत्री लॉन्स, अंबड चौफुली येथे या पदयात्रेचा समारोप होईल. त्यानंतर दुपारी 2 वाजता गायत्री लॉन्स येथे प्रसिद्ध प्रबोधनकार विकास राजा आणि सुभाष कोठारे यांचा बुध्द भिम गीतांचा कार्यक्रम होणार आहे
या कार्यक्रमात सर्व उपासक आणि उपासीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन बुध्दविहार समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.