vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्राची होणार तपासणी

भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्राची होणार तपासणी

सातारा प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतक-यांना दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण निविष्ठा पुरवठा होण्याच्या दृष्टीने विविध योजना व अभियानाचे माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. खरीप हंगाम २०२५ अनुषंगाने शेतक-यांची फसवणूक व अतिरिक्त लुट होऊ नये या करिता सातारा जिल्हयामध्ये कृषी विभागामार्फत १२ भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्राची तपासणी करणेत येते, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.

कृषी निविष्ठा तक्रार निवारण फलकावर शेतक-यांनी आपली तक्रार विविध प्रकारे नोंदविता येवू शकते. ९८२२४४६६५५ या मोबाईल क्रमांकावर व्हॉटसअप व्दारे तक्रार नोंदविता येते. ७४९८९२१२८४ या मोबाईल क्रमांकावर फोन करुन शेतकरी तक्रार नोंदवू शकतात.तसेच क्युआर कोड स्कॅन करुन त्यावर येणारा छोटासा गुगल फॉर्म भरुन शेतक-यांनी तक्रार दाखल करुन घेतली जाणार आहे.

कृषी निविष्ठा केंद्रावर मुख्य निविष्ठेसोबत इतर निविष्ठा खरेदी करिता सक्ती ( लिकिंग ) केल्यास, कृषी निविष्ठा देण्यास टाळाटाळ केल्यास, खरेदीची पावती देण्यास नकार दिल्यास किंवा गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास शेतक-यांनी आपली तक्रार नोंदवावी. शेतक-यांच्यातक्रारीचे निराकरण कृषि विभागामार्फत केले जाणार आहे, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती फरांदे यांनी कळविले आहे

0000

संबंधित पोस्ट

पालकमंत्री अजित पवारांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळेबीड येथे ‘सीट्रिपलआयटी’ उभारणीच्या कामाला गती बीडमधील ‘सीट्रिपलआयटी’साठी एमआयडीसीकडूनचार हजार चौरस मीटर जागा व निधी देण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार 

विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये ज्ञानक्षम व्हावे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री  यांनी सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांचे केले स्वागत..

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया व कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रक्रिया उद्योगांना मोठे अनुदान10 टन क्षमतेचे तेल काढणी युनिट, मिनी ऑईल मिल, 250 मे. टन गोदाम व कडधान्य प्रक्रिया-पॅकेजिंग युनिटसाठी अर्जाची मागणी,राष्ट्रीय खाद्यतेल अभियान व कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी 15 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाचा शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta

पुढील वर्षासाठीच्या 820 कोटींच्या प्रारूप विकास आराखड्यास मान्यता* – *पालकमंत्री शंभूराजे देसाई*

vishwatmaklokswamivarta