vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जमातीचा सामुहिक विवाह सोहळा आयोजनासाठी स्वंयसेवी संस्थांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

अनुसूचित जमातीचा सामुहिक विवाह सोहळा आयोजनासाठी स्वंयसेवी संस्थांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, व लातुर जिल्यातील अनुसूचित जमातीच्या लाभधारकांना कन्यादान योजने अंतर्गत सन २०२५-२६ या वित्तीय वर्षात अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांच्या विवाह सोहळयातील अनुचित प्रथांना आळा घालण्यासाठी सामुहिक विवाह सोहळा आयोजनासाठी स्वंयसेवी संस्थेमार्फत प्रोत्साहन देवुन अशा विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या दाम्पत्यांना अर्थिक सहाय्य देण्यासाठी कन्यादान योजना राबविण्यासाठी संस्थेमार्फत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगरच्या प्रकल्प अधिकारी चेतना डी.मोरे यांनी केले आहे.

कन्यादान योजनेसाठी सादर करावयाचे प्रस्ताव व कागदपत्रांमध्ये सदर संस्थेने सादर करावयाचा प्रस्ताव विहीत नमुन्यातील अर्ज (कार्यालयात उपलब्ध), सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्थेने आपल्या प्रस्तावासोबत विवाह (लग्नाचे) ठिकाणाचा पत्ता व दिनांक सोबत जोडुन सादर करावे, विवाह विषयक माहिती (कार्यालयात उपलब्ध) तसेच वर व वधु लाभार्थ्याचे सत्यप्रतीचे प्रस्ताव अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे.

कन्यादान योजनेचा अनुसूचित जमाती लाभार्थ्याच्या विवाह सोहळयासाठी अर्जाचा नमुना शासकीय सुटी सोडुन कार्यालयीन वेळेत मिळणार आहे. प्रस्ताव परिपूर्ण भरुन कार्यालयात ३१ ऑगस्ट, २०२५ पर्यत दाखल करणे आवश्यक आहे. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही, असेही पत्रात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

नागसेन बुद्ध विहार येथे सावित्रीच्या लेकींकडून “सावित्रीमाई फुले” यांना जयंती निमित्त अभिवादन…

धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकांसाठी खाटा राखीव ठेवणे बंधनकारक प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांची तपासणी करावी – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

पश्चिम आशियातील युद्धामुळे #एलपीजीगॅस च्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर-महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

ऐतिहासिक घटना: भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म

vishwatmaklokswamivarta

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाची उभारणी”बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा” तत्त्वावर

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते निराधार योजनेतील लाभार्थींना मंजुरी आदेश वाटप- संजय गांधी निराधार अनुदान योजनेची एकूण ११७ प्रकरणे पात्र- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची एकूण ८१ प्रकरणे पात्र…